शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकवटणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 17:05 IST

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत.

- विलास ओहाळपणजी - महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत. यापूर्वी असा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता गट-तट विसरून एकत्र येण्याची ही काळाची गरज बनली आहे, असे मत आरपीआयचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा राज्याचे प्रभारी सुरेश बारशिंगे यांनी व्यक्त केले. गोवा राज्य प्रदेश कार्यकारिणी निवडीसाठी ते बारशिंगे गोव्यात आले आहेत. त्यावेळी महाराष्ट्रीतील पक्षाच्या कामाविषयी आणि भवितव्याविषयी त्यांच्याशी ‘लोकमत’ने वार्तालाप केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी घनश्याम चीमलकर, बाळासाहेब बनसोडे यांची उपस्थिती होती. 

कोपर्डी बलात्कारानंतर मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे निघाले त्यातून जातीय तेढ निर्माण झाली नसल्याचे आपणास वाटते, असे सांगत बारशिंगे म्हणाले की, मोर्चा काढण्याचा त्यांचा अधिकार आहे. मराठा आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे, ती रास्तच आहे. आम्ही त्यांच्या आड येणार नाही, पण आमच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता त्यांना आरक्षण द्यावे. या दोन्ही समाजात अनेक गरीब कुटुंब आहेत, हे मान्यच करावे लागेल. आर्थिक आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ज्यांची ही मागणी आहे त्यांनी अगोदर आंतरजातीय विवाह स्वीकारायला हवा. आंतरजातीय विवाह झाल्यास जात-धर्माचा वाद संपुष्टात येणार आहे. 

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यापूर्वी हा प्रयत्न झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षातर्फे मायावतींनी केलेला सोशल इंजिनियरिंगचा प्रयत्न यशस्वी झाला. आमचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा असेल. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आल्यास मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यासाठी आठवले हे स्वत: तयार आहेत, तसा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. 

आठवले 24 जानेवारीला गोव्यातकेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 24 जानेवारी  रोजी गोव्यात येणार आहेत. यावेळी ते समाजकल्याण खात्याचे मंत्री, अधिकारी वर्गाची भेट घेणार आहेत. येथील समाजकल्याण खात्याचे प्रश्न सोडविण्याबाबत ते चर्चा करतील. तसेच राज्यात पक्ष वाढीसाठी कार्यकारिणीला मार्गदर्शन आणि पणजीत कार्यकत्र्याचा मेळावाही ते घेणार आहेत.