शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकवटणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 17:05 IST

महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत.

- विलास ओहाळपणजी - महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत. यापूर्वी असा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. आता गट-तट विसरून एकत्र येण्याची ही काळाची गरज बनली आहे, असे मत आरपीआयचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा राज्याचे प्रभारी सुरेश बारशिंगे यांनी व्यक्त केले. गोवा राज्य प्रदेश कार्यकारिणी निवडीसाठी ते बारशिंगे गोव्यात आले आहेत. त्यावेळी महाराष्ट्रीतील पक्षाच्या कामाविषयी आणि भवितव्याविषयी त्यांच्याशी ‘लोकमत’ने वार्तालाप केला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी घनश्याम चीमलकर, बाळासाहेब बनसोडे यांची उपस्थिती होती. 

कोपर्डी बलात्कारानंतर मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे निघाले त्यातून जातीय तेढ निर्माण झाली नसल्याचे आपणास वाटते, असे सांगत बारशिंगे म्हणाले की, मोर्चा काढण्याचा त्यांचा अधिकार आहे. मराठा आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे, ती रास्तच आहे. आम्ही त्यांच्या आड येणार नाही, पण आमच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता त्यांना आरक्षण द्यावे. या दोन्ही समाजात अनेक गरीब कुटुंब आहेत, हे मान्यच करावे लागेल. आर्थिक आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण ज्यांची ही मागणी आहे त्यांनी अगोदर आंतरजातीय विवाह स्वीकारायला हवा. आंतरजातीय विवाह झाल्यास जात-धर्माचा वाद संपुष्टात येणार आहे. 

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष सर्व जाती-धर्माच्या लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यापूर्वी हा प्रयत्न झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षातर्फे मायावतींनी केलेला सोशल इंजिनियरिंगचा प्रयत्न यशस्वी झाला. आमचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा असेल. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखील रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट एकत्र आल्यास मोठी शक्ती निर्माण होऊ शकते. त्यासाठी आठवले हे स्वत: तयार आहेत, तसा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. 

आठवले 24 जानेवारीला गोव्यातकेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे 24 जानेवारी  रोजी गोव्यात येणार आहेत. यावेळी ते समाजकल्याण खात्याचे मंत्री, अधिकारी वर्गाची भेट घेणार आहेत. येथील समाजकल्याण खात्याचे प्रश्न सोडविण्याबाबत ते चर्चा करतील. तसेच राज्यात पक्ष वाढीसाठी कार्यकारिणीला मार्गदर्शन आणि पणजीत कार्यकत्र्याचा मेळावाही ते घेणार आहेत.