शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

गोव्यात पर्यटन का रोडावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:35 IST

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली.

- राजू नायकगोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर ३१ डिसेंबरची बेहोशी रात्र संपल्यावर एक अत्यंत किळसवाणे चित्र उभे राहते. किना-यावर लोक दारू ढोसून पडलेले, बाटल्या व काचा विखुरलेल्या, प्लास्टिक कचरा... त्यानंतर काही दिवस गोव्यातील प्रसार माध्यमे आक्रंदतात. म्हणतात, या प्रकारचे पर्यटन तुम्हाला हवे आहे काय? एका बाजूला ‘सगबर्न’सारखे इलेक्ट्रॉनिक महोत्सव- ज्याची बदनामी प्रत्येक वर्षी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने होणा-या मृत्यूमुळे होते तर दुस-या बाजूला हे असे बीभत्स किळसवाणे चित्र.

या वेळी गोव्यात कमीच पर्यटक आलेत. जागतिक प्रवासी तर खूप थोडे आले. अलीकडे ‘थॉमस कूक’सारख्या प्रतिष्ठित प्रवासी कंपन्या बंद झाल्यानंतर काही चांगल्या देशांतून येणारे पर्यटक कमीच झाले आहेत. एकेकाळी ब्रिटन, जर्मनीसह युरोपीय देशांतील पर्यटकांची गोव्यात रीघ असायची. त्यानंतर इस्रायली पर्यटक येणे सुरू झाले. आता त्यांच्या जोडीला रशियन पर्यटक येतात. परंतु या दर्जाच्या पर्यटकांबद्दल गोव्यात फारसे चांगले बोलले जात नाही. कारण हे एकतर अत्यंत कफल्लक पर्यटक असतात, त्यांच्यामुळे चांगल्या दर्जाचे प्रवासीही येणे थांबवितात.

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली. विशेषत: पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या वर्तनाबद्दल समाज माध्यमांनी त्यांना खूप झोडून काढले. राज्य सरकारने दृष्टी नसलेला मंत्री नेमला आहे, अशी टीका झाली. परंतु सरकारलाच पर्यटनाबद्दल योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका नेहमीच होते. मद्य, अमली पदार्थ, सेक्स, जुगार अशा समाजाला फारशा न रुचणा-या गोष्टींनी पर्यटनाला ग्रासले आहे, यात तथ्य आहे. त्यामुळे कुटुंबवत्सल प्रवासी गोव्याकडे पाठ फिरवू लागला आहे.

शिवाय आशियातील इतर अनेक पर्यटन केंद्रे गोव्यापेक्षा स्वस्त आहेत. जे चांगल्या दर्जाचे प्रवासी येतात ते राजस्थान किंवा केरळला भेट देतात. तेथे गोव्यापेक्षाही स्वच्छ व नितळ पर्यटन असते. गोव्यात गेल्या अनेक वर्षांत ज्या लॉबी तयार झाल्या आहेत, त्यांनी या क्षेत्रात नवीन कल्पक योजना राबविण्यालाच विरोध केला आहे. विशेषत: टॅक्सीवाल्यांचा मोठा दबाव असतो, जे रेडिओ टॅक्सींना मज्जाव करतात. शॅकवाल्यांची किनाºयावर दादागिरी चालते. आता कॅसिनो लॉबीही तयार झाली आहे.

राज्य सरकारने आता पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर बसून गंभीर चर्चा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आम्हाला कोणत्या प्रकारचे पर्यटन हवे आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सोयी हव्या आहेत, सुरक्षा व्यवस्थेत काय बदल हवे आहेत, स्वच्छता-पर्यावरण याबाबत काय पावले उचलावीत, असे ते प्रश्न आहेत. पर्यटन व्यावसायिक म्हणतात, राज्य सरकारने गांभीर्याने कृती केली नाही, तर ज्या पद्धतीने खाण व्यवसाय बंद पडला, तसेच पर्यटनाचे होऊ शकते. या वर्षीच्या परिस्थितीने वास्तवाची गंभीर जाणीव सरकारला करून दिली आहे.

टॅग्स :goaगोवा