शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गोव्यात पर्यटन का रोडावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:35 IST

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली.

- राजू नायकगोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर ३१ डिसेंबरची बेहोशी रात्र संपल्यावर एक अत्यंत किळसवाणे चित्र उभे राहते. किना-यावर लोक दारू ढोसून पडलेले, बाटल्या व काचा विखुरलेल्या, प्लास्टिक कचरा... त्यानंतर काही दिवस गोव्यातील प्रसार माध्यमे आक्रंदतात. म्हणतात, या प्रकारचे पर्यटन तुम्हाला हवे आहे काय? एका बाजूला ‘सगबर्न’सारखे इलेक्ट्रॉनिक महोत्सव- ज्याची बदनामी प्रत्येक वर्षी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने होणा-या मृत्यूमुळे होते तर दुस-या बाजूला हे असे बीभत्स किळसवाणे चित्र.

या वेळी गोव्यात कमीच पर्यटक आलेत. जागतिक प्रवासी तर खूप थोडे आले. अलीकडे ‘थॉमस कूक’सारख्या प्रतिष्ठित प्रवासी कंपन्या बंद झाल्यानंतर काही चांगल्या देशांतून येणारे पर्यटक कमीच झाले आहेत. एकेकाळी ब्रिटन, जर्मनीसह युरोपीय देशांतील पर्यटकांची गोव्यात रीघ असायची. त्यानंतर इस्रायली पर्यटक येणे सुरू झाले. आता त्यांच्या जोडीला रशियन पर्यटक येतात. परंतु या दर्जाच्या पर्यटकांबद्दल गोव्यात फारसे चांगले बोलले जात नाही. कारण हे एकतर अत्यंत कफल्लक पर्यटक असतात, त्यांच्यामुळे चांगल्या दर्जाचे प्रवासीही येणे थांबवितात.

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली. विशेषत: पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या वर्तनाबद्दल समाज माध्यमांनी त्यांना खूप झोडून काढले. राज्य सरकारने दृष्टी नसलेला मंत्री नेमला आहे, अशी टीका झाली. परंतु सरकारलाच पर्यटनाबद्दल योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका नेहमीच होते. मद्य, अमली पदार्थ, सेक्स, जुगार अशा समाजाला फारशा न रुचणा-या गोष्टींनी पर्यटनाला ग्रासले आहे, यात तथ्य आहे. त्यामुळे कुटुंबवत्सल प्रवासी गोव्याकडे पाठ फिरवू लागला आहे.

शिवाय आशियातील इतर अनेक पर्यटन केंद्रे गोव्यापेक्षा स्वस्त आहेत. जे चांगल्या दर्जाचे प्रवासी येतात ते राजस्थान किंवा केरळला भेट देतात. तेथे गोव्यापेक्षाही स्वच्छ व नितळ पर्यटन असते. गोव्यात गेल्या अनेक वर्षांत ज्या लॉबी तयार झाल्या आहेत, त्यांनी या क्षेत्रात नवीन कल्पक योजना राबविण्यालाच विरोध केला आहे. विशेषत: टॅक्सीवाल्यांचा मोठा दबाव असतो, जे रेडिओ टॅक्सींना मज्जाव करतात. शॅकवाल्यांची किनाºयावर दादागिरी चालते. आता कॅसिनो लॉबीही तयार झाली आहे.

राज्य सरकारने आता पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर बसून गंभीर चर्चा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आम्हाला कोणत्या प्रकारचे पर्यटन हवे आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सोयी हव्या आहेत, सुरक्षा व्यवस्थेत काय बदल हवे आहेत, स्वच्छता-पर्यावरण याबाबत काय पावले उचलावीत, असे ते प्रश्न आहेत. पर्यटन व्यावसायिक म्हणतात, राज्य सरकारने गांभीर्याने कृती केली नाही, तर ज्या पद्धतीने खाण व्यवसाय बंद पडला, तसेच पर्यटनाचे होऊ शकते. या वर्षीच्या परिस्थितीने वास्तवाची गंभीर जाणीव सरकारला करून दिली आहे.

टॅग्स :goaगोवा