शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

गोव्यात पर्यटन का रोडावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:35 IST

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली.

- राजू नायकगोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर ३१ डिसेंबरची बेहोशी रात्र संपल्यावर एक अत्यंत किळसवाणे चित्र उभे राहते. किना-यावर लोक दारू ढोसून पडलेले, बाटल्या व काचा विखुरलेल्या, प्लास्टिक कचरा... त्यानंतर काही दिवस गोव्यातील प्रसार माध्यमे आक्रंदतात. म्हणतात, या प्रकारचे पर्यटन तुम्हाला हवे आहे काय? एका बाजूला ‘सगबर्न’सारखे इलेक्ट्रॉनिक महोत्सव- ज्याची बदनामी प्रत्येक वर्षी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने होणा-या मृत्यूमुळे होते तर दुस-या बाजूला हे असे बीभत्स किळसवाणे चित्र.

या वेळी गोव्यात कमीच पर्यटक आलेत. जागतिक प्रवासी तर खूप थोडे आले. अलीकडे ‘थॉमस कूक’सारख्या प्रतिष्ठित प्रवासी कंपन्या बंद झाल्यानंतर काही चांगल्या देशांतून येणारे पर्यटक कमीच झाले आहेत. एकेकाळी ब्रिटन, जर्मनीसह युरोपीय देशांतील पर्यटकांची गोव्यात रीघ असायची. त्यानंतर इस्रायली पर्यटक येणे सुरू झाले. आता त्यांच्या जोडीला रशियन पर्यटक येतात. परंतु या दर्जाच्या पर्यटकांबद्दल गोव्यात फारसे चांगले बोलले जात नाही. कारण हे एकतर अत्यंत कफल्लक पर्यटक असतात, त्यांच्यामुळे चांगल्या दर्जाचे प्रवासीही येणे थांबवितात.

गोव्यात पर्यटन रोडावल्यानंतर सरकारवर खूप टीका झाली. विशेषत: पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या वर्तनाबद्दल समाज माध्यमांनी त्यांना खूप झोडून काढले. राज्य सरकारने दृष्टी नसलेला मंत्री नेमला आहे, अशी टीका झाली. परंतु सरकारलाच पर्यटनाबद्दल योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका नेहमीच होते. मद्य, अमली पदार्थ, सेक्स, जुगार अशा समाजाला फारशा न रुचणा-या गोष्टींनी पर्यटनाला ग्रासले आहे, यात तथ्य आहे. त्यामुळे कुटुंबवत्सल प्रवासी गोव्याकडे पाठ फिरवू लागला आहे.

शिवाय आशियातील इतर अनेक पर्यटन केंद्रे गोव्यापेक्षा स्वस्त आहेत. जे चांगल्या दर्जाचे प्रवासी येतात ते राजस्थान किंवा केरळला भेट देतात. तेथे गोव्यापेक्षाही स्वच्छ व नितळ पर्यटन असते. गोव्यात गेल्या अनेक वर्षांत ज्या लॉबी तयार झाल्या आहेत, त्यांनी या क्षेत्रात नवीन कल्पक योजना राबविण्यालाच विरोध केला आहे. विशेषत: टॅक्सीवाल्यांचा मोठा दबाव असतो, जे रेडिओ टॅक्सींना मज्जाव करतात. शॅकवाल्यांची किनाºयावर दादागिरी चालते. आता कॅसिनो लॉबीही तयार झाली आहे.

राज्य सरकारने आता पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर बसून गंभीर चर्चा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आम्हाला कोणत्या प्रकारचे पर्यटन हवे आहे, त्यासाठी कोणत्या पायाभूत सोयी हव्या आहेत, सुरक्षा व्यवस्थेत काय बदल हवे आहेत, स्वच्छता-पर्यावरण याबाबत काय पावले उचलावीत, असे ते प्रश्न आहेत. पर्यटन व्यावसायिक म्हणतात, राज्य सरकारने गांभीर्याने कृती केली नाही, तर ज्या पद्धतीने खाण व्यवसाय बंद पडला, तसेच पर्यटनाचे होऊ शकते. या वर्षीच्या परिस्थितीने वास्तवाची गंभीर जाणीव सरकारला करून दिली आहे.

टॅग्स :goaगोवा