शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गोवा सरकार खाणी सुरू करण्याचे का टाळतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 22:40 IST

संसदेचे हिवाळी अधिवेशन मंगळवारी आणखी काही दिवसांनी वाढविले आहे. तरी या अधिवेशनात खाणी आणि खनिजे कायद्यात सुधारणा करून गेल्या मार्चपासून गोव्यात बंद पडलेल्या लोह खनिजाच्या खाणी पूर्ववत सुरू केल्या जातील अशी जी अटकळ बांधण्यात आली होती, तिच्यावर विरजण पडले आहे.

- राजू नायक

संसदेचे हिवाळी अधिवेशन मंगळवारी आणखी काही दिवसांनी वाढविले आहे. तरी या अधिवेशनात खाणी आणि खनिजे कायद्यात सुधारणा करून गेल्या मार्चपासून गोव्यात बंद पडलेल्या लोह खनिजाच्या खाणी पूर्ववत सुरू केल्या जातील अशी जी अटकळ बांधण्यात आली होती, तिच्यावर विरजण पडले आहे. त्यामुळे खाण अवलंबितांची घोर निराशा झाली आहे.

गेल्या १५ मार्चपासून खाणी बंद आहेत. राज्य सरकारने २०१५ मध्ये खाण लिजांचे केलेले नूतनीकरण बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर त्यांच्यावर कु-हाड कोसळली. एकतर गोवा खनिज महामंडळ स्थापन करून किंवा लिजांचा लिलाव करून वा सहकार तत्त्वावर खाण अवलंबितांनाच त्या चालविण्यास देण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य सरकारला त्या चालू करता आल्या असत्या; परंतु राज्य सरकार त्याच्या हातात असलेले हे तिन्ही उपाय योजण्यास तयार नाही. त्यापेक्षा खाण व खनिजे (एमएमडीआर) कायद्यात सुधारणा करून वरील सर्व प्रक्रियेला बगल द्यावी, असा राज्याचा दृष्टिकोन राहिला आहे.

राज्य सरकारच का, पुती गावकर यांच्या नेतृत्वाखालील खाण अवलंबितांच्या संघटनेलाही एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती हा एकच उपाय खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी आहे, असे वाटते. त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेण्यास ते आसुसले आहेत; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेटण्याचे टाळले. यापूर्वी राज्याच्या तिन्ही खासदारांनी खाणमंत्र्यांसह भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना राज्याची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु केंद्रीय नेत्यांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतलेले नाही, मोदींनीही अजूनपर्यंत या मागणीकडे दुर्लक्षच केले. केवळ गोवा राज्यासाठी केंद्रीय कायद्यात बदल करून घटनात्मक तरतुदीला पायदळी कसे तुडवता येईल, हा खरा त्यांचा सवाल आहे. वास्तविक गोवा सरकारला कायदा आणि घटनेचीही पायमल्ली करून या ८८ खाणी त्याच चुकार, अप्रामाणिक व भ्रष्ट खाणचालकांकडे सुपूर्द करायच्या आहेत, त्यात ना राज्याचे हित आहे, ना देशाचे कल्याण, शिवाय त्यामुळे संपूर्ण भाजपावरच शिंतोडे उडू शकतात, याचा अंदाज आल्यामुळेच केंद्रीय नेते या जुमल्यापासून दूर राहिले आहेत. संसदेचे अधिवेशन जवळजवळ संपल्यामुळे आता अध्यादेश काढून कायदा दुरुस्ती करण्याचा एकमेव मार्ग राहातो; परंतु त्यामुळेही भ्रष्टाचाराचे आरोप आणखी तीव्र होण्याची खूप मोठी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा तशी भूमिका घेण्याचे धारिष्टय़ दाखविण्याची शक्यता कमीच आहे. गोव्यातील खाणचालकांची हात पिरगळून बेकायदेशीर कामे करून घेण्याची कार्यपद्धती देशात एकूणच सर्वाना माहीत झाली आहे. निवडणुकीच्या काळात ते पाण्यासारखा पैसा ओतून हा कायदा बदलून घेतील, अशीही अटकळ आहे आणि विरोधक त्याचा बाऊ करतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे भाजपा नेते सावधपणे पावले टाकीत असल्याचे लपून राहात नाही.

भाजपा सरकारने केंद्रात सत्तेवर येताच एमएमडीआर कायद्यात केलेला बदल नैसर्गिक खनिजे व सार्वजनिक मालमत्ता फुकटात दिल्या जाऊ शकत नाहीत, या घटनेतील तत्त्वांच्या अधीन राहूनच केला. आताही कायद्यात बदल केले तर कोणी तरी न्यायालयात जाऊन त्यांच्यावर बडगा हाणू शकतो. शिवाय भाजपाचे सध्याचे धोरण लिजांचा लिलाव हेच आहे. महामंडळ स्थापन करून खाणींचा व्यवहार सरकारने चालवावा किंवा सहकार संस्थांना त्या चालविण्यास देण्याच्या विरोधात उजवा पक्ष आहे. देशातील प्रमुख उद्योग समूह या सरकारच्या मागे राहाण्यासाठीही तीच उद्योगनीती कारण आहे. उजव्या पक्षांनी जगभर उद्योगांना अनुकूल धोरणे राबविली आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे, राज्य सरकार जरी केंद्राकडे अंगुलीनिर्देश करून साळसूदपणाचा आव आणीत असले तरी कोळसा खाणींप्रमाणे लोह खनिज हा केंद्रीय विषय नाही. एमएमडीआर कायद्यात या लोह खनिजांच्या खाणींचा लिलाव करण्याचे अधिकार राज्याला आहेत. त्यानुसार कर्नाटक व ओडिशाने आपले कर्तव्य बजावले व तेथे खाणी पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मग गोव्यातच असे काय घडले, येथे खाणी सुरू होत नाहीत?

लक्षात घेतले पाहिजे की ओडिशा व कर्नाटकात सर्वच खाणी ‘बेकायदेशीर’ नव्हत्या. तेथे एनएमडीसी व टिस्को कंपनीतर्फे ब-याच खाणींचे उत्खनन केले जाते. गोव्यात सुरुवातीपासून त्या खाणी ठरावीक कंपन्यांनाच आंदण दिल्या गेल्या व त्यासाठी राज्य सरकारने भयंकर स्वरूपाचे ‘जुमले’ केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सर्वच्या सर्व ८८ खाणी बंद पडल्या. ओडिशात व कर्नाटकात त्यांचे व्यवहार चालू राहिले, इतकेच नव्हे तर त्यांनी पोलाद निर्मितीत भर घालून देशाला ७५ टक्के जादा महसूल व चलन मिळवून दिले. आपल्या कंपन्यांनी केवळ निर्यातीवर भर देऊन देशाचे आर्थिक नुकसानच केले.

सध्या जेव्हा जीएसटीसारख्या नवीन करप्रणालीतून केंद्र व राज्याच्या महसुलाची विभागणी होऊ लागली तेव्हा एनएमडीसीसारख्या पोलाद मंत्रलयाच्या अखत्यारितील कंपनीला आम्ही फुकटात लिजेस का देऊ, असा प्रश्न कर्नाटकासारखे राज्य करते. त्यांच्या दाव्यात तथ्य नाही असे कोणी म्हणू शकत नाही; कारण लोह खनिजावर राज्याचा अधिकार आहे. दुर्दैवाने गोवा सरकार नवीन कायद्याने राज्य सरकारचा महसूल चारपटींनी वाढण्याची तरतूद करूनही त्या खाणी कायदा दुरुस्ती करून त्याच कंपन्यांना फुकटात देऊन टाकण्याची कर्मदरिद्री ‘वानसा’ बाळगते.

हेच कारण आहे, पर्रीकर सरकारला राज्यातील खाणी तत्काळ सुरू करण्यास अपयश येण्याचे. खाणी सुरू करण्यासाठी त्यांचा लिलाव व्हावा, अशी भूमिका केंद्रीय भाजपाने स्वीकारली आहे. तसे पाऊल पर्रीकर उचलायला गेले तर त्यांचे सरकार एक दिवसही टिकणार नाही, अशी त्यांना भीती आहे. त्यांचे सरकार खाण कंपन्यांच्या दबावाखाली आहे. राज्यातील खाण कंपन्या ‘तसा’ निर्णय घेणा-या सरकार पक्षाला माफ तर करणार नाहीच, उलट त्याची इभ्रतही घालवतील (कारण त्यांच्याकडे मीडिया आहे! शिवाय खाण अवलंबितांना चिथावून घालतील) अशी भीती पर्रीकरांना आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा