शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ऐतिहासिक चित्रपट तयार करताना संशोधन, तत्वे सांभाळूनच तयार करावे लागतात: करण जोहर

By समीर नाईक | Updated: November 21, 2023 17:41 IST

५४व्या आंचिममध्ये ऐ वतन मेरे वतन या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या इन कन्व्हर्सेशन सत्रात व्यक्त केलं मत

समीर नाईक, पणजी: ऐ वतन मेरे वतन हा चित्रपट प्रेरणा देणारा चित्रपट आहे. सत्य घटनांवर आधारित असा हा चित्रपट असून हा चित्रपट तयार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पुढील वर्षी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहर यांनी दिली. ५४व्या आंचिममध्ये ऐ वतन मेरे वतन या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या इन कन्व्हर्सेशन सत्रात बोलताना करण जोहर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री सारा अली खान, फिल्ममेकर कन्नन अय्यर, निर्माता अपूर्वा मेहता, प्राईम व्हिडिओच्या अपर्णा पुरोहित उपस्थित होते.

ऐ वतन चित्रपटात भावनांचा संगम आहे. ऐतिहासिक चित्रपटात तर संशोधन, तत्वे सांभाळूनच चित्रपट तयार करणे महत्वाचे आहे. तरच तो चित्रपट मनात राहतो. हा चित्रपट मनापासून तयार केलेला चित्रपट आहे असेही जोहर यांनी यावेळी सांगितले.

हा चित्रपट अनेक स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित असून यातील उषा हे पात्र शौर्याचे प्रतिक असून जे प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांची कहाणी अजून कुणालाच माहिती नाही अशा शूरवीरांची कथा सांगणे आवश्यक आहे. त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. या चित्रपटाचा आत्मा खूपच सुंदर आहे अशी माहिती अभिनेत्री सारा अली खान यांनी दिली.

सारा अली खान उषाबेन मेहता यांच्याशी प्रेरित असलेल्या पात्राची भूमिका करत आहे. भारत छोडो आंदोलनात ज्या काही खऱ्या घटना घडल्या त्याबद्दल आणि काही काल्पनिकदृष्ट्या मांडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत पुरुष स्वातंत्र्य सैनिकांबाबत मोठ्या प्रमाणात चित्रपट आलेत. परंतु महिला स्वातंत्र्यसैनिकांबाबत अजूनही चित्रपट कमी प्रमाणात आहेत अशी खंत कनन अय्यर यांनी व्यक्त यावेळी केली.

टॅग्स :Karan Joharकरण जोहरSara Ali Khanसारा अली खान