शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

गोव्यात काजूला आधारभूत किंमत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 08:54 IST

सरकारने शेतकऱ्याचे कष्ट, मनःस्ताप, वाढती महागाई या सर्वांचा विचार करून काजूला निदान २०० रुपये प्रति किलो आधारभूत किंमत द्यायला हवी.

अॅड. शिवाजी देसाई

दर १२३ रुपये प्रति किलो आहे. कोविडच्या कालावधीत गोव्यात काजूचा दर प्रचंड खाली आला होता. त्यामुळे समाजमाध्यमातून मी स्वतः आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनाची दखल तत्कालीन कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी घेतली. मला त्यांच्या केबिनमध्ये बोलाविले, काजूला आधारभूत किंमत कशी देता येते, हे त्यांना आम्ही सविस्तर समजावले. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रणजित राणे आणि अॅड. सतेज सिंह राणे हेदेखील होते. नंतर सरकारने काजूला आधारभूत किंमत दिली. मात्र, ती कमी आहे. आज प्रश्न असा आहे की काजू जे गोव्यात एक नगदी पीक आहे, त्याला आधारभूत किंमत द्या, अशी वारंवार मागणी का करावी लागत आहे?

गोव्यात दर वर्षी सरासरी २५,००० टन काजूचे उत्पादन होते. गोव्याचा काजू जागतिक पातळीवरील दर्जेदार काजू आहे. तरीही आज गोव्यात आफ्रिकेतून काजू येतो आणि इथे विकला जातो. गोव्याचा काजू अत्यंत रुचकर आहे. वास्तविक गोव्यात काजू पीक सोळाव्या शतकाच्या अखेरीस ब्राझीलमधून आले, असे म्हटले जाते; पण गोव्याने काजू पिकाला नगदी पीक आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून स्वीकारले. काजू बोंडूच्या रसापासून तयार होत असलेल्या फेणीला बाजारपेठेत खूप मागणी आहे. फेणीला तर गोव्याचे हेरिटेज ड्रिंक म्हणून घोषित केले आहे. बोंडूंच्या रसापासून दारू, फेणी, हुर्राक निर्माण करणारे सरकारकडून लिलावाद्वारे बोंडूंच्या रसातून दारू निर्माण करण्यासाठी भट्ट्या उभ्या करतात. या ठिकाणी काजू बागायतदार डब्यातून रस घालतात; पण रसाच्या डब्याची किंवा काजू बोंडूंची आजही काजू बागायतदारास, शेतकऱ्यास अल्प किंमत मिळते. हा दर आजही सरकारने निश्चित केलेला नाही. जेव्हा या रसापासून फेणी किंवा दारू तयार होते तेव्हा त्याची किंमत प्रती कळसा आठशे ते एक हजार रुपये असते. तसेच काजू भाजून जेव्हा त्याचे गर बाजारात विकायला येतात तेव्हा त्या गरांचीदेखील किंमत बाजारात प्रती किलो आठशे ते एक हजार रुपये आहे.

नेहमीच सांगितले जाते की, काजूचा शेतकऱ्याला मिळणारा दर हा बाजारभावावर अवलंबून असतो; पण ते सत्य नाही. कारण गोव्याचा काजू एक नंबर आहे. म्हणून शेतकऱ्याकडून विकत घेताना त्या काजूला खरे म्हणजे योग्य किंमत मिळायलाच हवी. मुळात शेतकरी, बागायतदार अनेक प्रकारच्या कष्टातून हे पीक उभे करत असतो. आज काजू बागायतीत साफसफाई करायला कामगार मिळत नाहीत. त्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. अनेक शेतकरी, बागायतदारांच्या काजू बागायतीत जायला नीट रस्ते नाहीत. लोक काजूने भरलेल्या पिशव्या डोक्यावरून घरी आणतात. मग डोक्यावरून रसाने भरलेले डब्बे भट्टीत पोहोचवतात. सरकारने काजू पीक रसायनमुक्त करणार हा संकल्प सोडलेला आहे. तो चांगला आहे; पण हे पीक अनेक शेतकऱ्यांच्या जगण्याचे साधन आहे. काजू शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारी कार्यालयात बसून समजणार नाहीत. त्यासाठी त्यांच्या काजू बागायतीत सरकारी अधिकाऱ्यांनी व मंत्र्यांनी जायला हवे आणि खऱ्या अर्थाने सरकार लोकांच्या दारी येते हे सिद्ध करायला हवे. हवामान चांगले नसेल तर काजू पीक अचानक खाली येते. मग शेतकऱ्यांनी बांधलेले सर्व अंदाज चुकतात आणि कपाळावर हात मारण्याची वेळ येते.

आजही सरकारला शेती बागायतीला उपद्रव करणाऱ्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. अनेक शेतकरी बोंडूंचा रस काढण्यासाठी विजेवर चालणारे मशीन वापरतात आणि हे मशीन फक्त काजू हंगामात सुरू. त्यामुळे प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला ते काजू हंगामावेळी दुरुस्त करावे लागते. सरकारने शेतकऱ्याचे कष्ट, मनःस्ताप, वाढती महागाई या सर्वांचा विचार करून काजूला निदान २०० रुपये प्रति किलो आधारभूत किंमत द्यायला हवी. शेतकरी सरकारकडे भीक मागत नाहीत, तर स्वतःचा हक्क मागत आहेत, हे लक्षात असू द्यावे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा