शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:30 IST

डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडला 'हेमलकसा'चा थक्क करणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : समाजसेवेचे बाळकडू आम्हाला बाबांकडून मिळाले. मी जेव्हा हेमलकसा येथे गेलो तेव्हा जीवन म्हणजे काय, भूक काय असते याची प्रचिती आल्याचा अनुभव समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी काल पर्यावरण दिन कार्यक्रमात मांडला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी डॉ. मंदाकिनी आमटेही उपस्थिती होत्या.

शाळेत असताना बाबांनी सहलीसाठी आम्हाला आदिवासी भागात नेले होते, तिथे त्यांची परिस्थिती पाहून मन हेलावले आणि तेव्हाच ठरवले की मला या लोकांसाठी काही तरी करायचे आहे. त्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर मी हेमलकसा येथे जाऊन सेवा करण्याचे ठरवले. लग्नानंतर मला दिलेल्या शब्दापोटी माझी बायको मंदाकिनी देखील माझ्यासोबत आली. अपार कष्ट तिनेही घेतले, म्हणून ही सेवा करणे शक्य झाल्याचे उद्‌गार आमटे यांनी काढले.

तेथील आदिवासी लोकांनी कपडे घातलेली माणसे कधी पहिलीच नव्हती, त्यामुळे आमचे स्वागत तिथे चांगले झाले नाही. पण आम्ही हार नाही मानली. तेथील बिकट स्थिती सुधारण्याचे ठरविले आणि आजही आमचे कार्य सुरू आहे. चौथ्या पिढीने हे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या गरजा कमी करून दुसऱ्याचे दुःख अनुभवल्यास आयुष्याचे खरे गणित कळेल, असेही डॉ. आमटे म्हणाले.

आमची सून गोव्याची, तीही आदिवासींचीच सेवा करतेय

गोव्याशी आमचे कौटुंबिक नाते आहे. आमची एक सून ही गोव्यातील आहे. के. डी साधले यांची ती मुलगी आहे. ती डॉक्टर असून, आता माझ्या मुलासोबत ती देखील आदिवासी भागात जाऊन सेवा देते. हेमलकसामध्ये जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा महिलांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या. ही स्थिती सुधारण्यावर आम्ही भर दिला. आता आमची गोव्याची सून स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने काम सोपे झाले, असे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

अन्नाचे आमिष दिले अन्...

चांगले जीवन जगायचे असेल तर आपल्या गरजा कमी ठेवणे, दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि अपेक्षा कमी ठेवणे या गोष्टी केल्या पाहिजेत. जनावरांना प्रेमाने वाढवले तर ते कुठलीच इजा करत नाहीत, हे मी जिवंत आहे यावरूनच समजून घ्या. भुकेपोटी आदिवासी लोक मुक्या प्राण्यांना मारायचे, हे पाहून मी त्यांना सांगितले की तुम्ही जर प्राण्यांना माझ्याकडे आणून दिले तर मी त्यांना अन्न पुरवेन. या अन्नाच्या आमिषाने त्यांनी वाघ, बिबटे, साप, अस्वल यासारखे हिंस्र प्राणी माझ्याकडे आणले. ज्यांचा मी सांभाळ केला, असेही डॉ. आमटे यांनी सांगितले.

आदिवासींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत ते जीवन जगू शकतात. ते उद्याचा कधीच विचार करत नाहीत, आज आपण कसे जगू याच प्रयत्नात त्यांचा दिवस जातो. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रचंड सहनशीलता आहे. आमच्याकडे उपचार करताना पूर्वी एनेसथेसिया नसायचा, तेव्हा आम्ही थेट घाव्यांवर टाके घालायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कुठलीच दुःखाची भावना दाखवली नाही. एका रुग्णाला तर मी १०० टाके घातले, तरी त्यांनी ते सहन केले. - डॉ. प्रकाश आमटे

टॅग्स :goaगोवाDr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे