शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस वाढण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:58 IST

या प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे.

ठळक मुद्देया प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे. चालू विधानसभा कार्यकाळात बिगर भाजप पक्षांच्या सदस्यांनी चार वेळा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राजू नायक

कॉँग्रेस पक्षातून १० आमदार आयात करण्याच्या भाजप नेत्यांच्या निर्णयामुळे या सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते कमालीचे उद्विग्न बनले आहेत. असे पहिल्यांदाच होते आहे की ते आपला राग, संताप जाहीरपणो व्यक्त करीत आहेत. भाजपचे संस्थापक सदस्य राजेंद्र आर्लेकर यांनी भाजपचे कॉँग्रेसीकरण झाल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या वैचारिक पाठीराख्या शेफाली वैद्य यांनी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना पक्षात घेण्याचा प्रकार नैतिक अध:पतन असल्याचे म्हटले आहे, तर सुमंत जोगळेकर या नव्या तरुण कार्यकर्त्याने आता सर्व निर्लज्ज भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये आल्याने पावन होणार का, असा सवाल केला आहे. 

या प्रकाराने सर्वात जास्त धक्का प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसला आहे. भाजपने आजपर्यंत आपले केडर महत्त्वाचे मानले होते. हे कार्यकर्ते मोफत घाम गाळून, वाईटपणा घेऊन कार्य करीत. सुरुवातीला कॉँग्रेसमधून उमेदवार आयात करण्याची प्रवृत्ती भाजपमध्ये सुरू झाली, त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये केवळ चुळबूळ होती. परंतु आज मोठय़ा संख्येने आमदारच आयात होत असल्याने पक्षात प्रचंड असंतोष आहे. फेसबूकवर आज चर्चा चालू होती की सध्या भाजपने जी सदस्यता मोहीम चालविली आहे, त्यात लोक वेगवेगळे प्रश्न करीत असल्याने अडचणी येत आहेत.  भाजपमध्ये आधीच १७ सदस्यांमध्ये सहा ख्रिस्ती आमदार होते. ते नेहमीच अस्वस्थ होते व त्यांच्या वक्तव्याने पक्ष नेहमीच अडचणीत येत असे. आता २७ सदस्यांत १४ ख्रिस्ती आमदार या पक्षाचे सदस्य बनले आहेत. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणो सौम्य होताहेत व भाजपचे कॉँग्रेसीकरण होत असल्याची टीका कार्यकर्ते करू लागले आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्याची तर घालमेल होते आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ताळगावचे दत्तप्रसाद नाईक. नाईक यांनी ताळगावमध्ये सतत संघर्ष केला व या मतदारसंघात सतत निवडून येत असलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्याशी वैर घेतले. परंतु पक्षाने संधी मिळते तेव्हा मोन्सेरात यांच्याशी नेहमीच तडजोड केली. २०१७ मध्ये पणजीत मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा निवडणूक लढविली त्यावेळी भाजपने मोन्सेरात यांचा पाठिंबा घेतला व त्यांना लाभाचे पद मिळवून दिले होते. त्यामुळे नाईक उद्विग्न बनून दुस-या मतदारसंघात कार्य करण्यासाठी निघून गेले होते. आता या घाऊक पक्षांतरामध्ये जेनिफर मोन्सेरात (ताळगाव) व बाबूश मोन्सेरात (पणजी) हे दाम्पत्य भाजपमध्ये सामील झाले आहे. त्यामुळे नाईक यांच्या श्रमांवर, मेहनतीवर, पक्षनिष्ठेवरही पाणी पडले आहे. 

चालू विधानसभा कार्यकाळात बिगर भाजप पक्षांच्या सदस्यांनी चार वेळा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीला विश्वजित राणे यांनी कॉँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनाही योग्य बक्षिसी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन पैकी दोघांनी भाजपचा टिळा लावला. त्यांना मंत्रिपदे देण्यात आली आणि आता १० सदस्य भाजपमध्ये पावन झाले आहेत. या मतदारसंघातील भाजप कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते व उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेले प्रमाणिक नेते उद्विग्न बनले तर नवल ते काय? दुर्दैवाने एकेकाळी कार्यकत्र्याच्या रक्तावर व घामावर पोसलेला हा पक्ष सत्तेला चटावलेला आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत