शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाताळनिमित्त गोव्यातील हॉटेल बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 14:02 IST

पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत.

म्हापसा - पुढील महिन्यात डिसेंबरात ख्रिस्ती बांधवांचा साजरा होणारा नाताळ तसेच त्यानंतर येणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हॉटेल्स बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. डिसेंबराच्या १५ तारीखनंतरचे हॉटेल बुकिंग जवळ-जवळ फुल्ल झाले आहे. १५ डिसेंबरपर्यंत ७० टक्क्यांहून जास्त बुकिंग हॉटेलचे करण्यात आलेले आहेत. गोव्यातील पर्यटन हंगामातील डिसेंबर हा सर्वात महत्त्वाचा व व्यस्त महिना मानला जातो. त्यामुळे इतर महिन्यापेक्षा पर्यटकांची सर्वात जास्त वर्दळ या महिन्यातच असते. डिसेंबरात हॉटेलना पर्यटकांकडून होत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेऊन हॉटेलचे भावही व्यवसायिकांकडून वाढवले जातात. 

डिसेंबर महिना हा ख्रिस्ती बांधवांचा सण साजरा करण्याचा महिना मानला जातो. या महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यात साजरा होणारे जुने गोंयच्या सायबाच्या फेस्तापासून उत्सवमय वातारवणाची निर्मिती गोव्यात होत असते. त्यामुळे जुने गोव्याच्या फेस्तसाठी आलेले बरेच पर्यटक नवीन वर्षापर्यंत राहणे पसंद करतात. नवीन वर्ष संपले की पुन्हा माघारी निघून जातात. 

नाताळ व नवीन वर्षाच्या तुलनेत उत्सवाच्या महिन्यात महिनाभर वास्तव्य करुन राहणारे पर्यटक बरेच कमी असतात. नाताळाच्या काळात २० डिसेंबर पासून ते नवीन वर्षापर्यंत दर वर्षी लाखोंनी देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात. शेवटच्या क्षणी त्रास होऊ नये यासाठी बरेच पर्यटक येण्यापूर्वी हॉटेलची आगाऊ नोंदणी करुन येणे पसंद करतात. ही नोंदणी किमान महिना दिड महिना अगोदर केलेली असते. 

पर्यटकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी विविध योजना हॉटेल व्यवसायिकांकडून उत्सवाच्या काळात खास करुन नाताळांच्या दिवसात जाहीर केल्या जातात. त्यात नाताळ ते नवीन वर्षापर्यंत पर्यटकांना दिला जाणाऱ्या पॅकेजचा सुद्धा समावेश असतो. या पॅकेजात नाश्ता जेवणा सोबत संगीत रजनी तसेच इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा समावेश असतो. दिले जाणारे पॅकेज हॉटेलच्या तारांकनावर अवलंबून असते. काही हॉटेल व्यवसायिकांनी दिलेल्या माहिती नुसार कांदोळी, कळंगुट, बागा, हणजूण, वागातोर सारख्या भागातील हॉटेल फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. 

येणारे पर्यटक शहरी भागातील हॉटेलपेक्षा किनारी भागातील हॉटेलात वास्तव करणे जास्त पसंद करतात. त्यामुळे शहरातील हॉटेलपेक्षा किनाऱ्यातील हॉटेलांना डिसेंबरात जास्त मागणी असते. किनाºयातील हॉटेलना असणारी ही मागणी पाहता शहरी हॉटेलपेक्षा किनारी हॉटेलचे भाव जास्त असतात. या मागणीमुळे इथल्या हॉटेलचे भाव इतर दिवसांच्या तिलनेत किमान ५० टक्क्यापर्यंत वाढवले जातात. इतर दिवसात शहरी हॉटेल व किनारी हॉटेलांचे भाव समान असतात; पण डिसेंबरात किमान २० ते ३० टक्क्यांचा फरक यात असतो. कळंगुट भागातील हॉटेल व्यवसायिक क्लावडियो पाशेको यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरपासून राज्यातील पर्यटक व्यवसायाला गती येत असते. त्यामुळे पुढील काही दिवसात ही गती येऊ लागेल. गती आल्यानंतर हॉटेल नोंदणीत वाढ होत जाईल. होत असलेली नोंदणी सर्वात जास्त नाताळच्या दिवसातील असते.   

टॅग्स :goaगोवाhotelहॉटेलTravelप्रवास