शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी म्हापसावासियांनी अडवला रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 15:50 IST

उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे.

म्हापसा : उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. संतप्त म्हापसावायिसांनी सुरुवातीला साहाय्यक अभियंत्याला घेराव घातला. नंतर म्हापशातील वाहतूक रोखून धरली. आंदोलनानंतर पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने वाहतूक पुन्हा मार्गी लागली.

ऐन चतुर्थीच्या काळात मागील सात दिवसापासून पूर्ण बार्देस तालुक्यात तसेच डिचोली तालुक्यातील काही भागातील पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाणी खेचणारे पंप नादुरुस्त झाल्याने हा परिणाम झाला होता. परिणामी काही लोकांनी चतुर्थी नियंत्रित पाणी पुरवठ्याने काही लोकांना गढूळ पाणी पुरवठ्याने तर काहींना टँकरद्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्यातून साजरी करावी लागली. 

सणासाठी पाणी नसल्याने संतप्त झालेल्या म्हापशातील लोकांनी बार्देस तालुक्याच्या विभागाचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंता सुभाष बेळगावकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला व पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. या दरम्यान त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे पाहून त्यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या म्हापसा बस स्थानकासमोरी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडवली. त्यात महिलांचा समावेश होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीस कुमक सुद्धा मागवण्यात आली. 

निरीक्षक तुषार लोटलीकर आपल्या फौजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. नंतर बेळगावकर यांच्या कार्यालयात जावून त्यांच्याशी चर्चा केली. केलेल्या चर्चे अंती बेळगावकर यांनी नंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत फोनवरुन चर्चा करुन आज संध्याकाळपर्यंत म्हापसावासियांना पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांना दिले. संध्याकाळपर्यंत काही भागात पुरवठा पूर्ववत करण्याचे तसेच उद्या राहिलेल्या इतर भागातील पुरवठा सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्या भागात पुरवठा होणार नाही त्या भागातील लोकांनी नागरिकांना टँकरद्वारे पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर जमलेल्या नागरिकांनी उद्यापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असून पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा त्यांच्या कार्यालयाला धडक देण्याचा इशारा दिला. 

दरम्यान बिघाड झालेले पंप बदलण्याचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती बेळगावकर यांनी दिली. हे काम अंतिम टप्प्यात असून उद्यापर्यंत ८५ टक्के भागातील पुरवठा सुरळीत केला जाणार असून शुक्रवारपर्यंत तालुक्यातील पुरवठा सुरळीत होणार असल्याचे ते पुढे म्हणाले. 

  

टॅग्स :goaगोवाWaterपाणी