शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा! सुभाष शिरोडकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 08:23 IST

लोकांनी घाबरून न जाण्याचे केले आवाहन.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मान्सून मंदावला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या ५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत आहे. ६ जुलैपर्यंत मान्सून कमकुवत राहिला तरी परिणाम होणार नाही, असे सांगत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गरज पडल्यास खाणींच्या खंदकांमधील पाणी वापरणार असल्याचे सांगितले.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, साळावली, अंजुणे धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. आमठाणे धरणात ३० ते ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तिळारी धरणातही भरपूर प्रमाणात पाणी आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात ते वापरू. ओपा प्रकल्पातील जलाशयातही पुरेसे पाणी आहे.

धरणांमधील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे आढळले की, संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणाया साळावली धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडी धरण कोरडे पडले आहे. अंजुणे धरणात फक्त ४ टक्के पाणी राहिले आहे. चापोली धरणात ४२ टक्के, आमठाणे धरणात ४४ टक्के तर गावणे धरणात ३६ टक्के पाणी राहिले. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तिळारीचे कालवे अधूनमधून फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तिळारीचे पाणी बेभरवशाचे आहे.

६ जुलैपर्यंत मान्सून अत्यंत कमजोर राहणार, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केल्याने तसे झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारचा असा दावा आहे की, धरणांमध्ये पुढील ५० ते ६० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण