शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा! सुभाष शिरोडकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 08:23 IST

लोकांनी घाबरून न जाण्याचे केले आवाहन.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मान्सून मंदावला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या ५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत आहे. ६ जुलैपर्यंत मान्सून कमकुवत राहिला तरी परिणाम होणार नाही, असे सांगत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गरज पडल्यास खाणींच्या खंदकांमधील पाणी वापरणार असल्याचे सांगितले.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, साळावली, अंजुणे धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. आमठाणे धरणात ३० ते ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तिळारी धरणातही भरपूर प्रमाणात पाणी आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात ते वापरू. ओपा प्रकल्पातील जलाशयातही पुरेसे पाणी आहे.

धरणांमधील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे आढळले की, संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणाया साळावली धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडी धरण कोरडे पडले आहे. अंजुणे धरणात फक्त ४ टक्के पाणी राहिले आहे. चापोली धरणात ४२ टक्के, आमठाणे धरणात ४४ टक्के तर गावणे धरणात ३६ टक्के पाणी राहिले. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तिळारीचे कालवे अधूनमधून फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तिळारीचे पाणी बेभरवशाचे आहे.

६ जुलैपर्यंत मान्सून अत्यंत कमजोर राहणार, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केल्याने तसे झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारचा असा दावा आहे की, धरणांमध्ये पुढील ५० ते ६० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण