शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा! सुभाष शिरोडकर यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 08:23 IST

लोकांनी घाबरून न जाण्याचे केले आवाहन.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: मान्सून मंदावला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. सध्या ५० ते ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणांत आहे. ६ जुलैपर्यंत मान्सून कमकुवत राहिला तरी परिणाम होणार नाही, असे सांगत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी गरज पडल्यास खाणींच्या खंदकांमधील पाणी वापरणार असल्याचे सांगितले.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, साळावली, अंजुणे धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. आमठाणे धरणात ३० ते ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तिळारी धरणातही भरपूर प्रमाणात पाणी आहे. अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात ते वापरू. ओपा प्रकल्पातील जलाशयातही पुरेसे पाणी आहे.

धरणांमधील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतला असता असे आढळले की, संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणाया साळावली धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडी धरण कोरडे पडले आहे. अंजुणे धरणात फक्त ४ टक्के पाणी राहिले आहे. चापोली धरणात ४२ टक्के, आमठाणे धरणात ४४ टक्के तर गावणे धरणात ३६ टक्के पाणी राहिले. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, तिळारीचे कालवे अधूनमधून फुटण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तिळारीचे पाणी बेभरवशाचे आहे.

६ जुलैपर्यंत मान्सून अत्यंत कमजोर राहणार, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केल्याने तसे झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सरकारचा असा दावा आहे की, धरणांमध्ये पुढील ५० ते ६० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.

 

टॅग्स :goaगोवाDamधरण