शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यातील धरणांची पाणी पातळी घटतेय! मान्सून लांबल्याने गोमंतकीयांचे वाढणार टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:15 IST

पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एकीकडे मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे कसे होईल, अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण दक्षिण गोवा ज्याच्यावर अवलंबून आहे, त्या साळावली धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे. पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

मान्सून लांबल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जलस्रोत खात्याचे अधिकारी दैनंदिन तत्त्वावर पाण्याची पातळी तपासत आहेत. त्यानुसार आमठाणे धरणात सध्या ५५ टक्के पाणी आहे. चापोली धरणात ४६ टक्के तर गावणे धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. महाराष्ट्र-गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे; परंतु तिळारीच्या बाबतीत सर्व काही बेभरवशाचे आहे.

बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला तिलारीचे पाणी न मिळाल्यास आमठाणेहून घेतले जाते, तसेच साळ येथून शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते. चांदेल प्रकल्पाला पाणी न मिळाल्यास कळणे नदीतून पंपिंग करून घेतले जाते, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. धरणांमधील पाणी कमी दिसत असले तरी कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.

पावसाची हुलकावणी

१ यंदा मान्सूनचे आगमन ४ दिवस उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु हा उशीर केवळ ४ दिवस असणार की त्यापेक्षा अधिक असणार या बाबतीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार आतापर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडक द्यायला हवी होती, परंतु अद्याप त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही.

 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस