शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राज्यातील धरणांची पाणी पातळी घटतेय! मान्सून लांबल्याने गोमंतकीयांचे वाढणार टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:15 IST

पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एकीकडे मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट होत असल्याने पिण्याच्या पाण्याचे कसे होईल, अशी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण दक्षिण गोवा ज्याच्यावर अवलंबून आहे, त्या साळावली धरणात केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे. पंचवाडी धरणात ७ टक्के तर अंजुणे धरणात ११ टक्के पाणी राहिले आहे.

मान्सून लांबल्यास पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जलस्रोत खात्याचे अधिकारी दैनंदिन तत्त्वावर पाण्याची पातळी तपासत आहेत. त्यानुसार आमठाणे धरणात सध्या ५५ टक्के पाणी आहे. चापोली धरणात ४६ टक्के तर गावणे धरणात ४१ टक्के पाणीसाठा आहे. महाराष्ट्र-गोवा सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र ९६ टक्के पाणीसाठा आहे; परंतु तिळारीच्या बाबतीत सर्व काही बेभरवशाचे आहे.

बार्देश तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला तिलारीचे पाणी न मिळाल्यास आमठाणेहून घेतले जाते, तसेच साळ येथून शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते. चांदेल प्रकल्पाला पाणी न मिळाल्यास कळणे नदीतून पंपिंग करून घेतले जाते, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. धरणांमधील पाणी कमी दिसत असले तरी कच्चे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.

पावसाची हुलकावणी

१ यंदा मान्सूनचे आगमन ४ दिवस उशिरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु हा उशीर केवळ ४ दिवस असणार की त्यापेक्षा अधिक असणार या बाबतीतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार आतापर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडक द्यायला हवी होती, परंतु अद्याप त्या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही.

 

टॅग्स :goaगोवाRainपाऊस