शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आमठाणे धरणातील पाण्याची पातळी ५० टक्के घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या आमठाणे जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्के घटली आहे. बार्देश तालुक्याची भिस्त अस्नोडा प्रकल्पावर असते. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आमठाणे धरणच आधार असते. तेथे आज ही स्थिती आहे.

अलीकडचे तिळारीच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर १४ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला. या काळात आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी घेण्यात आले. अंजुणे धरण सध्या ६६ टक्के भरलेले आहे. सत्तरी तालुका या धरणावर अवलंबून आहे.

साळावली धरणाच्या जलाशयात ७८ टक्के पाणी भरलेले आहे. काणकोणला पाणी पुरवणारे चापोली धरण ७४ टक्के भरले आहे. गवाणे धरणातही ७५ टक्के जलसाठा आहे. तर शिरोडा व परिसराला पाणी पुरवणाऱ्या पंचवाडी धरणात ६१ टक्के पाणी आहे.

चिंतेचे कारण नाही : सुभाष शिरोडकर

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याच्या पातळीचे आम्ही दैनंदिन तत्त्वावर मॉनिटरिंग करतो. सध्याची पातळी नॉर्मल आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांना बऱ्यापैकी पाणी मिळाले. त्यामुळे पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध आहे. येत्या मे मध्ये अडवपाल, साळ येथील बंधारा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शापोरा नदीचे पाणी येथे साठवून ठेवले जाणार आहे. हे पाणी मिळू शकेल. त्यानंतर उत्तर गोव्यातील पाण्याची समस्या दूर होईल.'

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी