शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आमठाणे धरणातील पाण्याची पातळी ५० टक्के घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या आमठाणे जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्के घटली आहे. बार्देश तालुक्याची भिस्त अस्नोडा प्रकल्पावर असते. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आमठाणे धरणच आधार असते. तेथे आज ही स्थिती आहे.

अलीकडचे तिळारीच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर १४ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला. या काळात आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी घेण्यात आले. अंजुणे धरण सध्या ६६ टक्के भरलेले आहे. सत्तरी तालुका या धरणावर अवलंबून आहे.

साळावली धरणाच्या जलाशयात ७८ टक्के पाणी भरलेले आहे. काणकोणला पाणी पुरवणारे चापोली धरण ७४ टक्के भरले आहे. गवाणे धरणातही ७५ टक्के जलसाठा आहे. तर शिरोडा व परिसराला पाणी पुरवणाऱ्या पंचवाडी धरणात ६१ टक्के पाणी आहे.

चिंतेचे कारण नाही : सुभाष शिरोडकर

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याच्या पातळीचे आम्ही दैनंदिन तत्त्वावर मॉनिटरिंग करतो. सध्याची पातळी नॉर्मल आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांना बऱ्यापैकी पाणी मिळाले. त्यामुळे पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध आहे. येत्या मे मध्ये अडवपाल, साळ येथील बंधारा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शापोरा नदीचे पाणी येथे साठवून ठेवले जाणार आहे. हे पाणी मिळू शकेल. त्यानंतर उत्तर गोव्यातील पाण्याची समस्या दूर होईल.'

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी