शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आमठाणे धरणातील पाण्याची पातळी ५० टक्के घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या आमठाणे जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्के घटली आहे. बार्देश तालुक्याची भिस्त अस्नोडा प्रकल्पावर असते. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आमठाणे धरणच आधार असते. तेथे आज ही स्थिती आहे.

अलीकडचे तिळारीच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर १४ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला. या काळात आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी घेण्यात आले. अंजुणे धरण सध्या ६६ टक्के भरलेले आहे. सत्तरी तालुका या धरणावर अवलंबून आहे.

साळावली धरणाच्या जलाशयात ७८ टक्के पाणी भरलेले आहे. काणकोणला पाणी पुरवणारे चापोली धरण ७४ टक्के भरले आहे. गवाणे धरणातही ७५ टक्के जलसाठा आहे. तर शिरोडा व परिसराला पाणी पुरवणाऱ्या पंचवाडी धरणात ६१ टक्के पाणी आहे.

चिंतेचे कारण नाही : सुभाष शिरोडकर

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याच्या पातळीचे आम्ही दैनंदिन तत्त्वावर मॉनिटरिंग करतो. सध्याची पातळी नॉर्मल आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांना बऱ्यापैकी पाणी मिळाले. त्यामुळे पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध आहे. येत्या मे मध्ये अडवपाल, साळ येथील बंधारा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शापोरा नदीचे पाणी येथे साठवून ठेवले जाणार आहे. हे पाणी मिळू शकेल. त्यानंतर उत्तर गोव्यातील पाण्याची समस्या दूर होईल.'

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी