शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आमठाणे धरणाच्या पाणी पातळीत झाली ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 08:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आमठाणे धरणातील पाण्याची पातळी ५० टक्के घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मान्सूनला अजून चार महिने बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबाबत पुढे काय वाढून ठेवले आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी पुरवणाऱ्या आमठाणे जलाशयातील पाण्याची पातळी ५० टक्के घटली आहे. बार्देश तालुक्याची भिस्त अस्नोडा प्रकल्पावर असते. तिळारीचे पाणी बंद झाल्यावर आमठाणे धरणच आधार असते. तेथे आज ही स्थिती आहे.

अलीकडचे तिळारीच्या डाव्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर १४ दिवस पाणीपुरवठा बंद करावा लागला. या काळात आमठाणे धरणातून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणी घेण्यात आले. अंजुणे धरण सध्या ६६ टक्के भरलेले आहे. सत्तरी तालुका या धरणावर अवलंबून आहे.

साळावली धरणाच्या जलाशयात ७८ टक्के पाणी भरलेले आहे. काणकोणला पाणी पुरवणारे चापोली धरण ७४ टक्के भरले आहे. गवाणे धरणातही ७५ टक्के जलसाठा आहे. तर शिरोडा व परिसराला पाणी पुरवणाऱ्या पंचवाडी धरणात ६१ टक्के पाणी आहे.

चिंतेचे कारण नाही : सुभाष शिरोडकर

जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'धरणांमधील पाण्याच्या पातळीचे आम्ही दैनंदिन तत्त्वावर मॉनिटरिंग करतो. सध्याची पातळी नॉर्मल आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणांना बऱ्यापैकी पाणी मिळाले. त्यामुळे पुरेसे कच्चे पाणी उपलब्ध आहे. येत्या मे मध्ये अडवपाल, साळ येथील बंधारा पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. शापोरा नदीचे पाणी येथे साठवून ठेवले जाणार आहे. हे पाणी मिळू शकेल. त्यानंतर उत्तर गोव्यातील पाण्याची समस्या दूर होईल.'

 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी