शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व भेद मिटले, तर भारत विश्वगुरू बनेल: वामन केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:19 IST

सर्व अन्याय संपला पाहिजे, जाती कशाला पाहिजेत?

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सर्व अन्याय संपला पाहिजे, - जाती कशाला पाहिजेत? भारत जर विश्वगुरू व्हायचा असेल, तर सगळे भेद मिटले पाहिजेत. सगळे मिळून - एका पातळीवर जोपर्यंत समाज येत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही, असे मत प्रख्यात नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

मडगावातील गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपण अमेरिकन लोकांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकेकाळी गोरे आणि काळे या दोन वर्णांचा संघर्ष तिथे चालू होता आणि काळ्यांना गुलाम म्हणून वागवले जायचे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संस्कृतीची श्रीमंती

माझ्या नाटकात शेतकरी किंवा शेतीशी संबंधित सगळे विषय येतात. पहाटे चार वाजता येणारे कुरमुरे, सहा वाजता येणारा वासुदेव, त्याच्या पुढे येणारा गोंधळ इथपासून रात्रीचे कीर्तन, भारुडापर्यंत आणि चावडीच्या मागच्या बाजूला चालणारा तमाशा इथपर्यंतचे सगळे हे शेतीप्रधान जीवनातून उभे राहिलेले आहे. या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासून म्हणजे नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत अक्षरश: माझ्यावर वर्षाव झालाय आणि त्या मला फुकट मिळाल्या. त्याच्यासाठी मी काही फारशी मेहनत केलेली नाही. माझ्या सुदैवाने मला लोककलेचे संस्कार फुकटामध्ये मिळाले, ही श्रीमंती मला मिळाली, असे केंद्रे पुढे म्हणाले.

चळवळ, आंदोलनांनी केले माझ्यावर संस्कार

त्या काळात राजकीय चळवळी व आंदोलने चालू होती. त्यांचा फार मोठा संस्कार किंवा परिणाम हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या विचार प्रक्रियेवर आहे, असे त्यांनी सांगितले. त्या काळामध्ये विद्याथ्र्यांच्या समस्येवर आंदोलने चालू होती. आठवीपासून त्यांच्याशी संबंध आला. पुढे शेतकयांच्या समस्यांवर मराठवाडा विकास आंदोलन झाले. त्याच्यामध्ये मी होतो. नंतर एक फार मोठे आंदोलन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले पाहिजे म्हणून झाले. विद्यापीठाच्या नामकरणानंतर ती आंदोलने शमली, असे केंद्रे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा