शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

सर्व भेद मिटले, तर भारत विश्वगुरू बनेल: वामन केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:19 IST

सर्व अन्याय संपला पाहिजे, जाती कशाला पाहिजेत?

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सर्व अन्याय संपला पाहिजे, - जाती कशाला पाहिजेत? भारत जर विश्वगुरू व्हायचा असेल, तर सगळे भेद मिटले पाहिजेत. सगळे मिळून - एका पातळीवर जोपर्यंत समाज येत नाही, तोपर्यंत हे घडणार नाही, असे मत प्रख्यात नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

मडगावातील गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. आपण अमेरिकन लोकांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकेकाळी गोरे आणि काळे या दोन वर्णांचा संघर्ष तिथे चालू होता आणि काळ्यांना गुलाम म्हणून वागवले जायचे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संस्कृतीची श्रीमंती

माझ्या नाटकात शेतकरी किंवा शेतीशी संबंधित सगळे विषय येतात. पहाटे चार वाजता येणारे कुरमुरे, सहा वाजता येणारा वासुदेव, त्याच्या पुढे येणारा गोंधळ इथपासून रात्रीचे कीर्तन, भारुडापर्यंत आणि चावडीच्या मागच्या बाजूला चालणारा तमाशा इथपर्यंतचे सगळे हे शेतीप्रधान जीवनातून उभे राहिलेले आहे. या सगळ्या गोष्टींचा लहानपणापासून म्हणजे नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत अक्षरश: माझ्यावर वर्षाव झालाय आणि त्या मला फुकट मिळाल्या. त्याच्यासाठी मी काही फारशी मेहनत केलेली नाही. माझ्या सुदैवाने मला लोककलेचे संस्कार फुकटामध्ये मिळाले, ही श्रीमंती मला मिळाली, असे केंद्रे पुढे म्हणाले.

चळवळ, आंदोलनांनी केले माझ्यावर संस्कार

त्या काळात राजकीय चळवळी व आंदोलने चालू होती. त्यांचा फार मोठा संस्कार किंवा परिणाम हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या विचार प्रक्रियेवर आहे, असे त्यांनी सांगितले. त्या काळामध्ये विद्याथ्र्यांच्या समस्येवर आंदोलने चालू होती. आठवीपासून त्यांच्याशी संबंध आला. पुढे शेतकयांच्या समस्यांवर मराठवाडा विकास आंदोलन झाले. त्याच्यामध्ये मी होतो. नंतर एक फार मोठे आंदोलन मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले पाहिजे म्हणून झाले. विद्यापीठाच्या नामकरणानंतर ती आंदोलने शमली, असे केंद्रे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा