शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोव्यात लोकसभेची पूर्वतयारी; मंगळवारपासून मतदार पडताळणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 13:45 IST

बीएलओ पहिल्यांदाच घरोघरी जाऊन मोहीम राबवणार

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून गोव्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. राज्याची मतदारयादी अत्यंत व्यवस्थित असावी, यासाठी मंगळवारपासून व्यापक मतदार उजळणी केली जाणार आहे. गोव्यातील 1 हजार 642 बीएलओ म्हणजेच गट पातळीवरील अधिकारी 15 मेपासून घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची खातरजमा करून घेणार आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार अस्तित्वात आहे की नाही, हे तपासून पाहण्याची मोहीम गोव्यात प्रथमच सुरू होत आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आल्तिनो येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदार याद्यांची उजळणी केली जाते. यानंतर जानेवारीत अंतिम यादी प्रसिद्ध होते. काही मृत मतदारांची तसेच जे मतदार दिलेल्या पत्त्यावर सापडत नाहीत, त्यांची नावे वगळणे आणि जे मतदारयादीत आपले नाव नोंदवू इच्छितात, अशा नव्या मतदारांची नावे यादीत नोंदवणे, असे काम यादी उजळणी कार्यक्रमावेळी केले जात असते. दरवर्षी ही प्रक्रिया होत असते व त्यात सगळे बीएलओ भाग घेत असतात. यावेळी मात्र सप्टेंबरऐवजी 15 मे पासूनच मतदारयाद्यांच्या सर्वकष उजळणीचे काम सुरू होत आहे. लोकसभा निवडणुका 2019 मध्ये होणार असल्याने पूर्वतयारी म्हणून सप्टेंबरऐवजी मे महिन्यातच काम सुरू करणे गरजेचे आहे, असे निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी लोकमतला सांगितले.राज्यात सध्या मतदारांची एकूण संख्या 11 लाख आहे. तीन वर्षांपूर्वी दहा लाख मतदारसंख्या होती. बहुतेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. जे गोवा सोडून गेले, ज्यांनी पोर्तुगाल किंवा अन्य देशाचा पासपोर्ट प्राप्त केला अशांची नावे यावेळीही मतदार याद्यांमधून वगळली जाणार आहेत. ते काम जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर होत असते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :goaगोवा