शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 07:54 IST

देश योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, नरेंद्र मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे, यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, साखळी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कार्यक्षम आहे. त्यांना पंचाहत्तर वर्षे झाल्यानंतर देखील त्यांच्याकडेच नेतृत्व राहायला हवे. भविष्यात त्यांना शंभर वर्षे झाली तरी, देशाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी यांच्याकडेच राहावे, अशी इच्छा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली.

कुळण साखळी येथे मोठा धार्मिक सोहळा काल पार पडला. त्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार जीत आरोलकर आदी अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांचेही या सोहळ्यावेळी भाषण झाले. त्यांनीही पंतप्रधान मोदी यांचे हात आता अधिक बळकट झाले आहेत, असे उद्‌‌गार काढले.

मंत्री विश्वजीत राणे यांनी आपण धार्मिक सोहळ्यावेळी पंतप्रधानांसाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. देशाला जगात मोदींनी मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देश ते योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे मंत्री राणे म्हणाले.

या सोहळ्यापूर्वी काही मंत्री, आमदारांनी शिवलिंगावर फुले वाहिली, पूजा, आरती केली. कार्यक्रम सायंकाळी झाला, पण सकाळीही या सोहळ्याच्या ठिकाणी मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत आदींनी भेट दिली. मंत्री ढवळीकर यांनीही अभिषेक केला. गेले अनेक दिवस मंत्री विश्वजित यांनी पुढाकार घेऊन साखळीत शंकर आराधनेचा सोहळा चालविला. त्यात मोठ्या संख्येने राजकीय नेते, उद्योजक व भाविक सहभागी झाले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी