शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विजय सरदेसाईंनी '१६ ब' कलम आणून गोव्याची वाट लावली: मनोज परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:44 IST

आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विजय सरदेसाई यांनी मंत्री असताना नगर नियोजन कायद्यात '१६ ब' कलम आणून गोव्याचा सत्यानाश केला, असा आरोप करत आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केला. आंदोलनात सहभागी न झाल्याबद्दल त्यांनी सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली.

सोमवारी महाआंदोलनावेळी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील निवासस्थानावर आंदोलकांनी मोर्चा नेला, तेव्हा सरदेसाई आंदोलनापासून दूर राहिले. 'कोणाच्या खासगी घरावर मोर्चा निर्णय मला पसंत नाही, असे म्हणत सरदेसाई यांनी आंदोलनात भाग घेतला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज परब यांनी मंगळवारी त्यांच्यावर टीका केली. टीसीपीच्या कलम '१६ ब' मुळे गोव्याचे मोठे नुकसान झाल्याचा दावा परब यांनी केला. ते म्हणाले की, या तरतुदीमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन रूपांतरण झाले आणि पर्यावरण तसेच पारंपरिक भूव्यवस्थेवर परिणाम झाला, असा दावा मनोज परब यांनी यावेळी केला.

राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झोन बदल आणि जमीन रूपांतरणाच्या प्रस्तावांना गती मिळाली. मुळातच गोव्यात कृषी जमीन व खुल्या जागा कमी होत आहेत. रिअल इस्टेट प्रकल्पांना प्राधान्य मिळत आहे. स्थानिकांच्या मालकीच्या जमिनींवर दबाव वाढत आहे. गोव्याची जमीन हळूहळू संपत चालली आहे. या निर्णयासाठी जबाबदार असलेल्यांनी याचे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी मनोज परब यांनी यावेळी केली.

चिंबल येथील आंदोलनाच्या संदर्भात परब यांनी एका विरोधी नेत्यावर नाव न घेता टीका केली. संबंधित नेता आंदोलनात सहभागी झाला नाही, कारण सत्ताधारी नेत्याशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विरोधी पक्षातील अनेक आमदार सत्ताधाऱ्यांशी 'समन्वय' ठेवून राजकारण करत आहेत.

नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी घरावर मोर्चा नेल्या प्रकरणी विचारले असता परब म्हणाले की, 'आम्ही जनतेचा आवाज योग्य ठिकाणी मांडत आहोत. आंदोलनाच्या पद्धतीपेक्षा मुद्द्यांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे.'

काही आमदारांचे सरकारकडे सेटिंग

परब यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काही विरोधी आमदारांचा 'भांडाफोड' करण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी असे म्हटले की, 'राज्यात खरी विरोधी भूमिका कोणी घेत नाही, सर्वजण परस्परांशी हातमिळवणी करूनच राजकारण करत आहेत. परब यांच्या म्हणण्यानुसार, काही आमदार जमीन व्यवहार, रिअल इस्टेट आणि सत्ताधाऱ्यांशी असलेल्या जवळीकीमुळे जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत नाहीत. कोण गोमंतकीय हितासाठी उभे आहे आणि कोण फायद्यासाठी राजकारण करत आहे, हे लोकांना लवकरच कळेल.

तथ्य जनतेसमोर यावे

परब म्हणाले की, विधानसभेत कलम ३९-अ ला विरोध झाला तेव्हाही सरदेसाई चर्चेत सहभागी झाले नव्हते. त्याने नेहमीच खोटारडेपणा केला आहे आणि यापुढेही राहतील. जमीन रूपांतरणाच्या विषयावर राजकीय नेते वेगवेगळे दावे करत असताना तथ्य जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कलम '१६ ब' नेमके काय?

गोव्याच्या नगर नियोजन कायद्यात झोन बदल आणि जमीन वापरात बदल करण्यासाठी विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या. २०१८ मध्ये नगर नियोजन कायद्यात अशी तरतूद करण्यात आली की, प्रादेशिक आराखड्यातील झोन बदलासाठी व्यक्तिगत अर्ज करता येतील. अर्जावर विभागीय स्तरावर विचार करून निर्णय घेतला जाईल. काही प्रकरणांमध्ये कृषी किंवा नैसर्गिक झोनचे इतर वापरात रूपांतरण शक्य झाले.

सरकारचा दावा फोल

सरकारचा दावा होता की, यामुळे लहान भूधारकांना त्यांच्या जमिनीचा विकास करण्याची संधी मिळेल आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल. या तरतुदींवर पर्यावरणवादी, स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून पूर्वीपासूनच टीका होत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विकास आराखड्याला बगल देऊन जमीन रूपांतरण होत आहे. पारंपरिक वस्ती आणि शेती क्षेत्र धोक्यात येत आहे तसेच पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येत आहे.' गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून जमीन रूपांतरणे, कलम '३९ अ', '१६ ब' आणि विकास आराखड्यांवरून विविध ठिकाणी आंदोलने झाली आहेत. पाळे, शिरदोणवासीयांनीही सध्या महाआंदोलन चालवले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sardesai's '16 B' ruined Goa: Manoj Parab's Blistering Attack

Web Summary : Manoj Parab accuses Vijay Sardesai of destroying Goa by implementing Section '16 B'. Parab criticizes Sardesai's absence from protests against land conversion, claiming the section facilitates widespread zoning changes and damages Goa's environment and traditional land systems. He alleges political collusion hinders genuine opposition, urging transparency in land deals.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण