शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सरदेसाई सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; युवा भाजपकडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:09 IST

म्हापशातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर तसेच उत्तर आणि दक्षिण गोवा अध्यक्ष उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: आमदार विजय सरदेसाई हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याने सरकारवर त्यांनी फक्त टीका करण्याचे सत्र सुरू केले असल्याचा आरोप भाजप युवा समितीने केला आहे. त्यांनी केलेली विधाने उत्तर न देण्यासारखी असल्याने लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आली आहेत.

म्हापशातील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर तसेच उत्तर आणि दक्षिण गोवा अध्यक्ष उपस्थित होते. सरदेसाई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या विधानावरून ते सत्तेपासून दूर राहू शकत नसल्याचे स्पष्ट होते, असे मांद्रेकर म्हणाले. ज्यावेळी ते सरकारमध्ये होते त्यावेळी सर्व काही चांगल्या पद्धतीने सुरू होते. पण सत्तेपासून दूर गेल्यावर सरकार वाईट कसे झाले, असाही प्रश्न करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. सरकारकडून सुरू असलेल्या कामे त्याला पहावत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवडून येण्याचे आवाहन देणाऱ्या सरदेसाई यांनी पुढील निवडणुकीत पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असेही आवाहन त्यांना करण्यात आले. सरदेसाई यांच्या टीकेकडे लोकांनी दुर्लक्ष करावे, असाही सल्ला यावेळी देण्यात आला.

विजय सरदेसाई यांचे मुख्यमंत्र्याना आव्हान

गोव्यात यापुढे गोवा फॉरवर्डचा एकही आमदार निवडून येणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत आहे. हिंमत असल्यास त्यांनी साखळी मतदारसंघात राजीनामा द्यावा. आपण फातोर्डा मतदारसंघाचा राजीनामा देतो. साखळी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यानी पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे. 

फातोर्डा मतदारसंघात पालिका प्रभागातील विकासकामांना जिल्हा संकुलाजवळ मंगळवारी संध्याकाळी प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा व इतर नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने निवडून आलेले आहे, अशी टीका केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा