शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

विजयची चाल, भाजप अस्वस्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:38 IST

सरदेसाई हे विरोधी आमदार आहेत. ते गोव्यात विरोधी पक्षनेतेही नाहीत. तरीदेखील त्यांना दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स कशा मिळतात, या प्रश्नाचे उत्तर भाजपचे काही बडे पदाधिकारी शोधू लागले आहेत.

- सद्गुरू पाटील

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई हे कोणत्या वेळी कोणती खेळी खेळतील, याचा नेम नसतो. राजकारण त्यांना बऱ्यापैकी कळते, हे वेगळे सांगायला नको. सरदेसाई यांनी गेल्या काही दिवसांत भाजपमधील काही नेत्यांच्या काळजाचे ठोके चुकविले. गोव्यातील पायाभूत साधनसुविधांशी निगडित प्रश्न घेऊन सरदेसाई यांनी परवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी सरदेसाई यांच्यासाठी बराच वेळ दिला. आपल्या मंत्रालयातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांनी विजयच्या मुद्द्यांवर बैठकच घेतली. दक्षिण गोव्यातील काही प्रकल्पांचा विषय सरदेसाई यांनी मांडला. गोव्यातील महामार्गाशी निगडित काही समस्या सोडविण्याबाबत गडकरी यांनी रस दाखवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनाही विजय सरदेसाई दिल्लीत भेटून आले. मडगावच्या जिल्हा इस्पितळाचे खासगीकरण नको, तिथे एम्ससारखी संस्था आणावी, ही भूमिका विजयने मांडली आहे. गोवा सरकारमधील अनेक मंत्री व एकूणच भारतीय जनता पक्ष विजयच्या नव्या खेळीमुळे आश्चर्यचकीत झाला आहे. सरदेसाई है। विरोधी आमदार आहेत. ते गोव्यात विरोधी पक्षनेतेही नाहीत. तरी देखील त्यांना दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स कशा मिळतात, या प्रश्नाचे उत्तर भाजपचे काही बडे पदाधिकारी शोधू लागले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनादेखील हा प्रकार नेमका काय आहे, ते कळेनासे झाले आहे. आज जर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असते, तर नितीन गडकरी यांनी पर्रीकर यांना विचारल्याशिवाय सरदेसाई यांना भेटीसाठी वेळच दिली नसती. सरदेसाई सासष्टीतील स्टील्ट ब्रीजसह जे मुद्दे घेऊन गडकरींकडे गेले होते, ते मुद्दे गोवा सरकारदेखील गडकरींकडे मांडू शकला असता. मात्र, सरदेसाई यांच्या दिल्ली भेटीमुळे एक प्रकारे गोवा सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अपयशही समोर आले आहे. सरदेसाई यांच्या दिल्ली भेटीचे व केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकांचे फोटो व्हायरल झाले. सरदेसाई यांच्या बैठकांच्या विषयाकडे गोवा भाजप फक्त पाहतच राहिला आहे. हा प्रकार नेमका काय? याविषयी प्रत्येक जण गोंधळून गेला आहे.

एक विरोधी आमदार, जो एरव्ही सावंत सरकारवर सर्व विषयांबाबत टीका करत असतो, स्थानिक भाजप मंत्र्यांवर आरोप करत असतो, तो आमदार दिल्लीत जाऊन भाजपच्याच केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन येतो. बैठका घेऊन येतो. गोव्याचे काही प्रश्न मांडल्याबाबत श्रेयदेखील घेतो. हे सगळे पाहून सावंत मंत्रिमंडळातील काही मंत्रीही चक्रावले आहेत. आम्हाला बायपास करून सरदेसाई आमच्या केंद्रीय मंत्र्यांना भेटून येतात, मग आमचे महत्त्व ते काय उरले? अशी चर्चा भाजपच्या गोव्यातील काही मंत्र्यांमध्ये सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनादेखील सरदेसाई यांचे सध्याचे कोडे सुटलेले नाही. सरदेसाई हे कदाचित पुढील काही महिन्यांत देखील उर्वरित केंद्रीय मंत्र्यांना भेटून येऊ शकतात. जलशक्ती मंत्र्यांना भेटून ते म्हादई पाणीप्रश्न तिथे मांडू शकतात. विजेच्या समस्येने गोमंतकीय हैराण झालेले आहेत. केंद्रीय वीजमंत्र्यांना भेटून सरदेसाई यापुढे गोव्याचा वीजप्रश्न देखील मांडू शकतात. काहीही घडू शकते. सरदेसाई यांना दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊन देण्यासाठी कुणी तरी पडद्याआडून वावरत आहे, असा संशय सरकारमधील काही आमदारांना येऊ लागला आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या मनात देखील हाच संशय असू शकतो.

सहसा कोणताच विरोधी आमदार स्थानिक मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट देशातील केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत नसतो, भेटीसाठी वेळदेखील केंद्रीय मंत्री सहसा देत नसतात. मात्र, सरदेसाई यांनी या स्थितीवर मात करून श्रेयवादाची खेळी तूर्त जिंकली आहे. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमक होते, सक्रिय व कार्यक्षम होते, पण तेदेखील केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना कधीच दिल्लीत केंद्रातील मंत्र्यांना जाऊन भेटत नव्हते. त्यांना भेटीसाठी केंद्रीय मंत्री वेळ देणार होते की नाही, हादेखील मुद्दा आहेच. सरदेसाई यांनी गडकरींसोबत असलेले आपले जुने नाव व परिचय यांचा वापर केला. 

गोव्यात २०१७ साली मध्यरात्रीच्या वेळी भाजपचे सरकार घडले होते, त्यावेळी गडकरी यांनी विजय व सुदिन ढवळीकर यांचे मन जिंकले होते. या दोन्ही नेत्यांना त्यांनी आपलेसे केले होते. ते संबंध आता सरदेसाई यांच्या थोडे कामी आले. दिल्ली भेटीवेळी गडकरी यांनी विजयशी खूप चांगल्या प्रकारे संवाद साधला. गोव्यातील काही मंत्री, आमदारांना याबाबतची माहिती मिळाली आहे.

विजयचा गोवा फॉरवर्ड पक्ष पूर्वी केंद्रातील एनडीएचा भाग होता. जेव्हा बाबू कवळेकर, बाबूश मोन्सेरातसह दहा काँग्रेस आमदार फुटले होते, तेव्हा गृहमंत्री अमित शाह यांनी सरदेसाई यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवला होता. गोवा फॉरवर्डच्या अन्य दोन्ही मंत्र्यांना डच्चू द्या; पण विजयला मंत्रिमंडळातून वगळू नका, असे अमित शाह यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितले होते. 

खासदार विनय तेंडुलकर यांनाही हे ठाऊक आहे. तेंडुलकर यांच्या उपस्थितीतच सगळ्या घडामोडी झाल्या होत्या. मात्र, विजयला मंत्रिमंडळातून वगळावे याच मागणीवर बाबूश मोन्सेरात, नुवेचे बाबाशान, कुंकळीचे क्लाफास डायस वगैरे ठाम होते. त्यामुळे केंद्रीय भाजप नेत्यांनीही शेवटी मागणी मान्य केली व विजयचे मंत्रिपद गेले होते. तरीदेखील बरेच महिने विजयने एनडीएशी फारकत घेतली नव्हती. सरदेसाई एनडीएसोबत राहिले होते. आता नव्याने काही सरदेसाई हे एनडीएचा भाग होणार नाहीत. भाजपमध्ये जाण्याचाही त्यांचा विचार मुळीच नाही.

लोकमतने सरदेसाई यांची सविस्तर मुलाखतही अलीकडेच छापली आहे. विजय जी गेम खेळले आहेत, ती राजकीयदृष्ट्या खूप हुशारीचीच आहे. राष्ट्रपती निवडणुकीवेळी विजयने द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने गोव्यात मतदान करावे, असा प्रयत्न भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी केला होता. अर्थात सरदेसाई यांनी तेव्हा मुर्मू यांना मत दिले नाही. 

मात्र, आता लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात विजयने काँग्रेसला मदत करू नये, विजयने 'सायलंट राहावे, असा प्रयत्न भाजपचे काही केंद्रीय नेते करू शकतात. शक्यता नाकारता येत नाही. भाजपचे गोव्यातील काही मंत्रीही तसे बोलतात. सरदेसाई यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संघर्ष चालविला असला, तरी भाजपचे केंद्रातील काही नेते अजून सरदेसाई यांना आपला शत्रू मानत नाहीत. कारण, सरदेसाई हे काँग्रेस पक्षात नाहीत. ते स्वतःचा स्वतंत्र पक्ष घेऊन बसले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेत्यांना ही स्थिती अशीच राहिलेली हवी आहे.

सहसा कोणताच विरोधी आमदार स्थानिक मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत नसतो. दिगंबर कामत हे जरी भाजपमध्ये गेले. तरी सासष्टीतील प्रश्न घेऊन ते देखील केंद्रीय मंत्र्यांना भेटू शकले नाहीत. किंवा त्यांना तशी गरजही वाटली नाही.

मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल व त्यामुळे केंद्रीयमंत्र्यांना भेटू नये, असादेखील विचार कामत करू शकतात.फातोड्याचे माजी आमदार दामू नाईक हे देखील विजयच्या नव्या गेममुळे आश्चर्यचकित झालेले असतील, असे राजकीय क्षेत्रात मानले जाते. विजय केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना भेटणार हे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनादेखील ठाऊक नव्हते.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा