शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वंदे मातरम् : एक प्रेरणामंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:53 IST

वंदे मातरम' हे अमर काव्य ऋषी बंकिमचंद्रांना ७नोव्हेंबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमी दिवशी स्फुरले होते, २०२५ हे या तेजस्वी गीताचे १५० वे स्फुरण स्मरण वर्ष आहे. त्यानिमित्त...

हिमालयम् समारभ्यं यावद इंदू सरोवर। तं देव निर्मितं देश हिंदुस्थानं प्रचक्षते ॥ हीच भावना वंदे मातरम गीतात आहे. कार्तिक शुद्ध नवमी, शके १७९७ म्हणजेच ७नोव्हेंबर १८७५ या दिवशी ऋषी बंकिमचंद्राच्या लेखणीतून हे गीत अवतीर्ण झाले. 'माते तुला वंदन असो' इतका सोपा अर्थ आहे 'वंदे मातरम्'चा.

'वंदे मातरम' शब्दात आमची संस्कृती आहे. या शब्दांनी मोठा इतिहास घडविला आहे. या शब्दात आमच्या प्रेरणा आहेत. या शब्दांमुळे आम्हाला मरणाचीही भीती वाटत नाही, इतके सामर्थ्य या दोन शब्दांत आहे.

एका राष्ट्राचा स्वातंत्र्यलढा ज्या शब्दांभोवती बांधला गेला, त्या शब्दांशिवाय आमच्या स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात "हे राष्ट्र जोपर्यंत आहे तोपर्यंत हे गीत राहणारच."

आमच्या भारतीय संस्कृतीचे स्रोत असलेले मातृपूजन, जननी, जन्मभूमी आणि जगनमाता यांच्या पूजनाचे प्रतीक असलेले शब्द म्हणजे वंदे मातरम.

१९०५ च्या वंगभंग चळवळीत हा मंत्र रणघोष बनला. स्वातंत्र्याचे प्रतीक बनला. वंदे मातरम शब्दांची इंग्रजांनी धास्ती घेतली. बालकांपासून वृद्धांपर्यंत, स्त्रियांपासून, सशस्त्र सत्याग्रहीपर्यंत

सशस्त्र लढा उभारणाऱ्या क्रांतिकारकांपर्यंत सर्वांनाच हा मंत्र परकीय सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी उद्युक्त करणारा ठरावा हेच या मंत्राचे विशेष आहे. बंकिमचंद्रांनी दुर्गेला, कालीमातेला भारत मातेच्या रूपात पाहिले. या स्वतःच्या जन्मभूमीला मातृपूजेची जोड दिली.

वेदांमध्ये पृथ्वीचे स्तवन आहे. अनेक ऋचांमध्ये घर, सुखसंपत्तीची इच्छा, रोगमुक्ती, दीर्घायुषी करण्याची प्रार्थना आहे. या सर्वात असे कुठेही प्रतित होत नाही की हे सर्व फक्त भारत देशातील लोकांसाठीच उपलब्ध आहे, इथे तर संपूर्ण पृथ्वीवरील मानव जातीच्या कल्याणासाठी प्रार्थना आहे. भारतीय दृष्टीने वंदे मातरम चा अर्थ पृथ्वीमाता किंवा भूमातेला वंदन असा आहे. हा जयघोष कुणाच्याही विरुद्ध नाही.

वंदे मातरम हे शब्द प्राचीन भारतीयांनी सांगितलेल्या विश्वात्मक संस्कृतीचे दर्शनच आहे. ज्या भूमीवर, ज्या धरतीवर आम्ही जन्मालो, ती मातेसमानच आहे. वंदे मातरम हे केवळ एक गीत नव्हे तर ती एक कलाकृती आहे, ती एक सहज अंत प्रेरणा आहे. 'वंदे मातरम' हे अमर काव्य ऋषी बंकिमचंद्रांना ७ नोव्हेंबर १८७५ रोजी कार्तिक शुद्ध नवमी दिवशी स्फुरले होते, २०२५ हे या तेजस्वी गीताचे १५० वे स्फुरण स्मरण वर्ष आहे. 

ऋषी बंकिमचंद्रांकडून वंदे मातरम या हिऱ्याला 'आनंदमठ'चे अत्यंत सुंदर कोंदण लांबले आहे. या गीताने स्वातंत्र्य लढ्यातील लाखो लोकांना, नेत्यांना प्रेरणा दिली. इसवी सन १९०५ पासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या कालखंडातील हिंदुस्थानच्या इतिहासातील बहुतेक सर्व घटना, आंदोलने, चळवळी, शस्त्र सिद्ध उठाव हे वंदे मातरम शब्दाशी जोडले गेले आहेत. बंगालची फाळणी हा इतिहासाचा महत्त्वाचा टप्पा. वंदे मातरमचा घोष संपूर्ण हिंदुस्थानभर पोहोचवण्यास बंगालची फाळणीच कारणीभूत झाली.

१९ व्या शतकाच्या अखेरीस कलकत्ता हीच इंग्रजांची राजधानी होती. १८९९ मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांची नेमणूक झाली. आणि जुलूम अत्याचाराचा कळस गाठला गेला, वंदे मातरम् शब्दांमधली आग इंग्रजी सत्तेला भस्मसात करणारी होती. बंगालच्या फाळणीची घोषणा झाली आणि त्याचा निषेध करायला जमलेल्या भारतीयांच्या मुखातून शब्द उमटले, वंदे मातरमा आज आपण हा मंत्र विसरलो आहोत, म्हणून भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा मुद्दाम घेण्याची आवश्यकता वाटते. ही भरतभूमी माझी मातृभूमी आहे, तिच्यासाठी मी सर्व काही करीन अशी तयारी असणारे हजारो तरुण मी तयार करीन, अशी भावना वंदे मातरमच्या उच्चारणातूनच प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल. त्यासाठी इतिहासाचे अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. 

'वंदे मातरम' म्हणत सर्वस्व अर्पिणाऱ्या देशभक्तांच्या चरित्रातून अशी प्रेरणा सहज मिळते. आजच्या काळात क्रांतीची गरज असेलच असे नाही, तर आपल्या देशाला त्याच्या गौरवाच्या स्थितीत परत नेऊन ठेवण्यासाठी खूप मोठ्या त्यागाची आणि कार्याची गरज आहे. देवभूमी असलेल्या मातृभूमीकडे गेली अनेक वर्षे आम्ही अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. सनातन अशा भारतमातेच्या प्रतिष्ठेसाठी गौरवासाठी आणि तिच्या सर्व शत्रूचा नाश करण्यासाठी तिला शरण गेले पाहिजे.

आज संपूर्ण देश वंदे मातरम या महामंत्राची दीडशे वर्षे साजरी करत असताना एकच निर्धार करूया, भारतमातेच्या चरणी समर्पण केलेल्या आपल्या पूर्वजांची आठवण ठेवून या मातृभूमीला तिच्या अत्युच्च स्थानावर नेण्यासाठी समर्पित होऊया।

- वल्लभ केळकर, म्हापसा

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Mataram: An Inspirational Mantra - History and Significance

Web Summary : Vande Mataram embodies Indian culture, inspiring freedom struggles. From the 1905 movement to today, it symbolizes devotion to the motherland. Celebrating 150 years, it urges dedication to Bharat Mata's glory, echoing the sacrifices of patriots and the need for national unity and progress.
टॅग्स :goaगोवाVande Mataramवंदे मातरम