शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात विरोधकांची पोकळी; मीही त्याला कारण: मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:05 IST

राज्यात कॉंग्रेसचे सरकार यावे या हेतूने आपण कॉंग्रेसमध्ये गेलो होतो. विरोधात बसण्यासाठी नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्यात कठोर विरोधकांची कमतरता जाणवत आहे. त्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे. मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये गेला. पक्षांतरामुळे राज्याचे राजकारण बदलले याची खंत, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल व्यक्त केली.

भाजपमध्ये आपण कुठल्याही अटींशिवाय गेलो आहोत. मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास समोर ठेवून पक्षांतर केले. विरोधात असताना विकासकामांना गती मिळत नाही, कामे होत नाहीत. निवडणूक वर्षात कामांसाठीच्या निविदा जारी केल्या जातात. त्यानंतर आचारसंहिता लागू होतात, पुन्हा कामे ठप्प होतात अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

लोबो म्हणाले, कळंगुट व शिवोली या दोन्ही मतदारसंघांचा विकास व तेथील लोकांची कामे व्हावीत, हाच आपला हेतू आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर मंत्रिपद मिळाले नाही, असे लोक म्हणतात. मात्र मंत्री झालो नाही म्हणून आपल्याला कुठलाही फरक पडत नाही. मागील एका वर्षात कळंगुट व शिवोलीत कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यापैकी अनेक कामे मार्गी लागली आहेत. यात जल शुध्दीकरण प्रकल्प, रस्ते आदींचा समावेश आहे. कामे होत असल्याने आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधक म्हणून विजय एकटेच

राज्यात कॉंग्रेसचे सरकार यावे या हेतूने आपण कॉंग्रेसमध्ये गेलो होतो. विरोधात बसण्यासाठी नाही. मात्र मतदारांनी काँग्रेसला हवा तसा कौल दिला नाही. सध्या राज्याला कठोर अशा विरोधी पक्षाची कमतरता भासत आहे. पक्षांतर केल्याने याला कुठे तरी मी सुध्दा जबाबदार आहे. सध्या विजय सरदेसाई हेच विरोधकाची भूमिका निभावत आहेत, असल्याचेही ते म्हणाले.

पर्यटकांची सतावणूक थांबवा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या नावाखाली गोव्यात येणाया पर्यटकांची पोलिस सतावणूक करीत आहेत. पर्यटकांची सतावणूक थांबायला हवी. मुख्यमंत्र्यांकडे हा विषय आपण मांडला. मात्र ते पोलिस महासंचालकांनी तसा आदेश कढल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत नसतानाही अडवली जात आहेत हे थांबायला हवे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवा