शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

पणजीची वाट लागली, आमदार बदला; उत्पल पर्रीकर संतापले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:40 IST

'स्मार्ट सिटी'वरून बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पणजीचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम झाले आहेत. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे स्मार्ट सिटीची वाट लागली असून त्याचा त्रास पणजीकरांना भोगावा लागत आहे, असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर केला. यावेळी त्यांनी लोकप्रतिनिधी बदलण्याची सादही पणजीवासीयांना घातली.

काल, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश चोपडेकर, दीपक म्हापसेकर, शुभदा धोंड व रेखा कांदे उपस्थित होत्या. स्मार्ट सिटी कामातील बेजबाबदारपणामुळे पणजीकरांसह इतरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, माजी नगरसेवकाच्या मुलाचा अपघातात बळी गेला, त्याला स्मार्ट सिटीचे अनियोजित कामच जबाबदार आहे; पण पणजीचे आमदार त्यांचे महापौर पुत्र याविषयी काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. 

पणजीवासीयांच्या सूचना हे लोकप्रतिनिधी ऐकून घेत नसल्याने लोकांचे फोन आम्हाला येत आहेत. हा आमदार स्मार्ट सिटीचा निधी निवडणुकीसाठी वापरत आहे. आतातरी पणजीवासीयांनी हे नेतृत्व बदलण्याची गरज आहे, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक संजित रॉड्रिग्ज यांना निवेदन दिले असून त्यात विविध मागण्या केल्या आहेत. तसेच लवकर या प्रकल्पाच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांना पणजीकरांच्या सर्व समस्या सांगितल्या जातील, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

पक्षाशी निष्ठावंत राहिलो

पणजीत पोटनिवडणूक झाली तेव्हा मला पणजीवासीयांकडून निवडणूक लढविण्याचा दबाव येत होता; पण मी पक्षश्रेष्ठीच्या सांगण्यावरून निवडणूक लढविली नाही. त्यावेळी निवडणूक लढविण्याची मी तयारी दर्शविली असती तर मला अडवायची कोणाची हिंमत झाली नसती; पण दुसऱ्यावेळीही माझ्यावर तसेच आमच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे हे कळल्यावर मी अपक्ष निवडणूक लढविली. अजूनही पणजीतील निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत असून आम्ही कधीही बंडखोरी केलेली नाही, असेही उत्पल पर्रीकर म्हणाले.

महापौरांवर अविश्वास ठराव आणा

आमदार म्हणून पणजीचे प्रतिनिधित्व करताना मनपातही स्वतःच्या मुलाला महापौर म्हणून आणून बसविले आहे. मात्र, ते दोघेही आपल्या पदाला योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे विरोधी नगरसेवक तसेच सत्ताधारी नगरसेवकांनी पणजीवासीयांसाठी एकत्र येत महापौरांवर अविश्वास ठराव आणणे गरजेचे आहे. बाबूश यांच्या दबावाला बळी न पडता पणजीत अयोग्य घडत आहे त्याला पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही उत्पल पर्रीकरांनी नगरसेवकांना केले.

 

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकरPoliticsराजकारण