शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

"आपत्कालीन व्यवस्थापन कायदा भल्या कामासाठीही वापरा"; सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 13:15 IST

Goa News : विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले.

पणजी - सरकार काहीही करू शकते हे आतापर्यंत मोपा व इतर प्रकल्पाच्या बाबतीत आढळून आले आहे. आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा बोंडवाळ तळ्यालाही लावा असा खोचक सल्ला विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला. सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडीस यांनी बोंडवाल तळ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ही तळी फुटली तर मोठी पूर आपत्ती येणार आहे. 100 हून अधिक लोक त्यात बळी पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या तळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. या तळीच्या दुरुस्तीचे काम सुरूच झाले नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावर उत्तर देताना जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे काम सुरू होऊ शकले नाही असे सांगितले. त्या जागेवर कूळहक्क असलेली हिराबाई कवळेकर हिने दुरुस्ती कामाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे काम रखडले. खालच्या न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने खालच्या न्यायालयात पाठविले. खालच्या न्यायालयाने एक विशेष समिती करून सर्वेक्षण केले. सर्वेक्षण अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. त्यामुळे सरकार तूर्त न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहे. 

त्यावर रुडाल्फ बोलले की सरकारला हवे अस ल्यास सरकार काहीही करू शकते. ज्या पद्धतीने सरकारने मोपा अंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पुढे नेले त्या पद्धतीने बोंडवाळ तळ्याचे कामही करून टाका अशी मागणी केली. त्यावर मंत्री शिरोडकर हे उभे राहून सरकारला कायदे पाळूनच काम करावे लागते असे रुडाल्फ यांना समजावत होते, परंतु त्यावेळी विजय सरदेसाई यांनी रुडाल्फ यांच्या मताशी सहमती व्यक्त केली आणि सरकारला शक्य असल्यास सरकार कोणतेही काम तडीस नेऊ शकते असे सांगितले. बोंडवाल तळीची दुरुस्ती न केल्यास त्या ठिकाणी पूरदुर्घटना होवू  शकते. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लावून हे काम करून घ्या असे सांगितले. हे सांगतानाच अशा भल्या कामासाठीही आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करा असा खोचक सल्लाही दिला.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत