शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'अर्बन नक्षल'च्या मुद्याला नव्याने फोडणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:42 IST

भाजप चिंतन बैठकीत पुन्हा मांडला विषय, निवडणूक रणनीतीवर चर्चा.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/म्हापसा: राज्यात "अर्बन नक्षल' वावरत आहेत, अशा प्रकारचा मुद्दा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा म्हापशातील भाजप चिंतन बैठकीत मांडला. अर्बन नक्षल मुद्दा आपण यापूर्वी जाहीरपणे मांडताना खूप विचारपूर्वकच मांडला, कारण काही विरोधकांच्या कारवायाच तशा आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपचे चिंतन शिबिर काल म्हापशात पार पडले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुश्यंतकुमार गौतम यांनी मार्गदर्शन केले. शिबिरास केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, मावीन गुदिन्हो, विश्वजीत राणे, आलेक्स सिक्वेरा, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर, दिगंबर कामत, मायकल लोबो, गणेश गावकर, दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्ळेकर, फ्रान्सिस सिल्वेरा, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, बाबू कवळेकर, विनय तेंडुलकर, गोविंद पर्वतकर, सुलक्षणा सावंत, सुवर्णा तेंडुलकर, महानंद अस्नोडकर, रुपेश कामत आदी नेते उपस्थित होते.

'लोकमत'च्या कुजबुजचा उल्लेख

प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी स्वागत केले. त्यांनी सर्व मंत्र्यांना बजावले की, बैठकीतील माहिती गुप्त ठेवायला हवी. बैठकीत जी चर्चा होते ती गुप्त ठेवा. कुणीच बैठकीनंतर कुजबुज देण्याचा प्रयल करू नये. लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने रणनीतीवर आपण सर्वांनी चर्चा करावी. शेवटीं निर्णव है दिल्लीत होत असतात. उगाच कुणी राजकीय कुजबुज प्रसार माध्यमाला देऊ नये, असे तानावडे बोलले, काल 'लोकमत'मध्ये दक्षिण गोव्यातील राजकारणाविषयी प्रसिद्ध झालेल्या कुजबुजच्या पाश्र्वभूमीवर तानावडे यांनी आम्हाला गप्प राहण्याचा हा सल्ला दिला असल्याचे बैठकीस उपस्थित काहीजणांनी नंतर 'लोकमत' ला सांगितले.

जाणीवपूवर्क विधान...

आपण अर्बन नक्षलीचा विषय यापूर्वी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या एका बैठकीत मांडला होता, आपण चुकून बोललो नव्हतो तर मुद्दामच तसे बोललो होतो, असे मुख्यमंत्री कालच्या बैठकीत सांगितले. एका राजकीय पक्षाच्या काँग्रेस नव्हे) कारवाया ह्य राजकीय पक्षाप्रमाणे नाहीत, त्यांच्या कारवाया वेगळ्याच पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे लक्ष ठेवायला हवे व त्यासाठीच आपण अर्थन नक्षल, असा उल्लेख केला होता.

अर्बन नक्षलीचा मुद्दा मांडताना आपण कोणत्याही पक्षाचे किया विरोधकांमधील कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. त्यामुळे चितन बैठकीत हा मुद्दा पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मांडला, एकंदरीत लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी अजेंडा निश्चित केला आहे. अर्बन नक्षलीविरोधात आपला सूर मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवल्याचे सर्व मंत्री व पदाधिकाऱ्यांना पहायला मिळाले.

बाबूश, गोविंद, नीळकंठ गैरहजर

चितन बैठकीला फक्त तिघेच मंत्री आले नाहीत. बाबूश मोन्सेरात, गोविंद गावडे व निळकंठ हळर्णकर हे पोहोचू सकले नाहीत. त्यांनी पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना दिली होती. मोन्सेरात यांनी अलिकडे पक्षाच्या बहुतेक कार्यक्रमांपासून स्वतःला दूरच ठेवले आहे. असे पक्षात बोलले जाते.

तिकीट दिल्लीत ठरणार....

भापजच्या या चिंतन शिबिरात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चिंतन शिबिरात उमेदवारीवर कोणतीही चर्चा झालेली नाही. निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली असून उमेदवारीचा निर्णय माव दिल्लीत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत