शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:52 IST

राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. नुकतेच पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वादळी वाऱ्याने गळून पडले आहेत. तर काही आंबे पावसामुळे कुजले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वाऱ्याने झडले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी अगोदरच आंब्याचे उत्पादन खूप कमी आहे. तसेच उशीरा उत्पादन झाले आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक मानकुराद आंबा दाखल झालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाहेरुन आयात केला जातो. आताच कुठेतरी बागायतीमध्ये आंबा पिकायला सुरुवात हाेणार होती. लाेक आता आंबे काढून पिकायला घालणार होते. पण त्या अगोदरच पाऊस आल्याने झाडावरील आंबे झडले तसेच ते कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

राज्यात अजून गेल्यावर्षीप्रमाणे आंबा दाखल झाला नसल्याने मानकुराद आंब्याचा दर ८०० ते १ हजार पर्यंत आहे. तर हापूस ६०० रुपये डझनने  विकला जात आहे. पण या वर्षी लागवड तसेच आवक कमी असल्याने  किमती खाली येणार नाही. असे काही आंबा उत्पादक सांगत आहेत. तरीही राज्यात उत्पादन वाढत आहे. 

सत्तरीतील आंबा उत्पादन शेतकरी यशवंत सावंत म्हणाले, आमच्या आंब्याच्या बागायतीमध्ये आताच कुठेतरी आंबे पिकायला आले होते. पुढील आठवड्यात हे आंबे काढून पिकायला घातले जाणार होते. पण शनिवारी अवकाळी  पाऊस झाल्याने झाडावरील कच्चे आंबे झडले. यावेळी आता ते कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आम्हाला फटक बसला आहे. अगाेदरच या वर्षी  आंब्याची लागवड कमी आहे त्यात आता ही नुकसान झाली आहे.

कृषी संचालक नेविल अल्फान्सो म्हणाले,  या वर्षी आंब्याच्या  हंगामाला उशीर झाला आहे. एकंदरीत  वेळ पाहता यंदा बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होणे गरजेचे होते. आंब्याच्या लागवडीस उशीर झाल्याने या वर्षी आंब्याचे उत्पादनात घट होऊ शकते. पण अजून पुढील मे महिना आहे. अवकाळी पाऊस झाला नाही शेतकऱ्यांना आंब्याचे पीक घेता येईल.

टॅग्स :goaगोवाMangoआंबा