शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका, आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:52 IST

राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.

नारायण गावस

पणजी: राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी  पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. नुकतेच पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वादळी वाऱ्याने गळून पडले आहेत. तर काही आंबे पावसामुळे कुजले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वाऱ्याने झडले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी अगोदरच आंब्याचे उत्पादन खूप कमी आहे. तसेच उशीरा उत्पादन झाले आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक मानकुराद आंबा दाखल झालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाहेरुन आयात केला जातो. आताच कुठेतरी बागायतीमध्ये आंबा पिकायला सुरुवात हाेणार होती. लाेक आता आंबे काढून पिकायला घालणार होते. पण त्या अगोदरच पाऊस आल्याने झाडावरील आंबे झडले तसेच ते कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

राज्यात अजून गेल्यावर्षीप्रमाणे आंबा दाखल झाला नसल्याने मानकुराद आंब्याचा दर ८०० ते १ हजार पर्यंत आहे. तर हापूस ६०० रुपये डझनने  विकला जात आहे. पण या वर्षी लागवड तसेच आवक कमी असल्याने  किमती खाली येणार नाही. असे काही आंबा उत्पादक सांगत आहेत. तरीही राज्यात उत्पादन वाढत आहे. 

सत्तरीतील आंबा उत्पादन शेतकरी यशवंत सावंत म्हणाले, आमच्या आंब्याच्या बागायतीमध्ये आताच कुठेतरी आंबे पिकायला आले होते. पुढील आठवड्यात हे आंबे काढून पिकायला घातले जाणार होते. पण शनिवारी अवकाळी  पाऊस झाल्याने झाडावरील कच्चे आंबे झडले. यावेळी आता ते कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आम्हाला फटक बसला आहे. अगाेदरच या वर्षी  आंब्याची लागवड कमी आहे त्यात आता ही नुकसान झाली आहे.

कृषी संचालक नेविल अल्फान्सो म्हणाले,  या वर्षी आंब्याच्या  हंगामाला उशीर झाला आहे. एकंदरीत  वेळ पाहता यंदा बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होणे गरजेचे होते. आंब्याच्या लागवडीस उशीर झाल्याने या वर्षी आंब्याचे उत्पादनात घट होऊ शकते. पण अजून पुढील मे महिना आहे. अवकाळी पाऊस झाला नाही शेतकऱ्यांना आंब्याचे पीक घेता येईल.

टॅग्स :goaगोवाMangoआंबा