शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय मंत्र्यांना गोव्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:03 IST

कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली. 

पणजी - राज्यात सध्या मच्छीमार आणि शॅक्स मालकांचे विविध प्रश्न अजेंडयावर असताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडून काही ठोस घोषणा मत्स्य महोत्सवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अशी काहीही घोषणा झाली नाही, यामुळे राज्यातील किनारी भागातील प्रश्नांची जाण केंद्रीय मंत्र्यांनाही नसावी का की ते जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्नही होत नसावा, असा सवाल उपस्थित होत आहे. 

कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली. 

ओखी वादळामुळे राज्यातील किनारी भागातील सुमारे दोनशेच्या आसपास शॅक्सचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शॅक्स मालकांनी वादळाची पूर्व कल्पना राज्य सरकारने दिली नाही, असा आरोप केला आहे. या प्रश्नापूर्वी राज्यातील मच्छीमारांनी अनुदान आणि निर्यातीवर राज्य सरकार कर लावत असल्याने मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही यावर अजिबात बोलण्याचे टाळले आहे. 

गोव्यातील हे प्रश्न ताजे असतानाच राज्यात येऊन केंद्रीय मंत्री मत्स्य महोत्सवास भेट देतात. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नांवर काही घोषणा किंवा तोडगा निघेल, अशी आशा असते. परंतु सिंग यांनी केंद्रीय योजना आणि त्याचा देशातील व गोव्यातील मच्छीमारांना झालेल्या फायद्याची आकडेवारी सांगण्यावर धन्यता मानली. जाता-जाता त्यांनी राज्य सरकारच्या या महोत्सवाचे कौतुकही करण्याची संधी सोडली नाही. 

यावरून राज्यातील असे गंभीर प्रश्न सिंग यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नसावा किंवा त्यांना या प्रश्नांची कल्पनाही राज्यातील नेत्यांनी येऊ न देण्याची पूर्ण काळजी घेतली असावी, असे दिसते. केंद्रातून संबंधित खात्याचा मंत्री येतो आणि स्थानिक प्रश्नावर बोलत नाही, म्हणजे नवलच करण्यासाखे आहे.