शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

केंद्रीय मंत्र्यांना गोव्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 21:03 IST

कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली. 

पणजी - राज्यात सध्या मच्छीमार आणि शॅक्स मालकांचे विविध प्रश्न अजेंडयावर असताना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडून काही ठोस घोषणा मत्स्य महोत्सवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अशी काहीही घोषणा झाली नाही, यामुळे राज्यातील किनारी भागातील प्रश्नांची जाण केंद्रीय मंत्र्यांनाही नसावी का की ते जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्नही होत नसावा, असा सवाल उपस्थित होत आहे. 

कांपाल मैदानावर राज्यातील मच्छीमार खात्याच्यावतीने चार दिवसीय मत्स महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवाला शनिवारी तिसरा दिवशी केंद्रीय मंत्री सिंग यांनी भेट दिली. 

ओखी वादळामुळे राज्यातील किनारी भागातील सुमारे दोनशेच्या आसपास शॅक्सचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या शॅक्स मालकांनी वादळाची पूर्व कल्पना राज्य सरकारने दिली नाही, असा आरोप केला आहे. या प्रश्नापूर्वी राज्यातील मच्छीमारांनी अनुदान आणि निर्यातीवर राज्य सरकार कर लावत असल्याने मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही यावर अजिबात बोलण्याचे टाळले आहे. 

गोव्यातील हे प्रश्न ताजे असतानाच राज्यात येऊन केंद्रीय मंत्री मत्स्य महोत्सवास भेट देतात. तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नांवर काही घोषणा किंवा तोडगा निघेल, अशी आशा असते. परंतु सिंग यांनी केंद्रीय योजना आणि त्याचा देशातील व गोव्यातील मच्छीमारांना झालेल्या फायद्याची आकडेवारी सांगण्यावर धन्यता मानली. जाता-जाता त्यांनी राज्य सरकारच्या या महोत्सवाचे कौतुकही करण्याची संधी सोडली नाही. 

यावरून राज्यातील असे गंभीर प्रश्न सिंग यांनी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नसावा किंवा त्यांना या प्रश्नांची कल्पनाही राज्यातील नेत्यांनी येऊ न देण्याची पूर्ण काळजी घेतली असावी, असे दिसते. केंद्रातून संबंधित खात्याचा मंत्री येतो आणि स्थानिक प्रश्नावर बोलत नाही, म्हणजे नवलच करण्यासाखे आहे.