शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 10:39 IST

साखळीत विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद, विविध योजनांची माहिती.

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : दहा वर्षाच्या कालावधीत मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत देश वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला असून, गोवा राज्याचाही सर्वांगीण कायापलट होत आहे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जात असून प्रत्येक घरात समृद्धी येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

साखळी पालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, राज्याने मोठी उपलब्धी साधताना आत्मनिर्भर गोव्याची वाटचाल पूर्ण यशस्वी केली आहे. सर्वच क्षेत्रात मोदींनी प्रगती साधताना देशाचा विश्वास संपादन केला आहे. सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. महिला कल्याण, किसान, गरीब कल्याण अंतर्गत सर्वच घटकांचा विकास झाला.

केंद्रीय अधिकारी डॉ. पवन कुमार यांनी राज्यात अनेक क्षेत्रांत मोठे बदल घडून आलेले असून, मोठी विकास क्रांती झाल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी मोदी व डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे विकासाला मोठी चालना मिळाल्याचे स्पष्ट केले

मुलांकडून पथनाट्याचे सादरीकरण, सरकारी अधिकाऱ्यांची विविध दालने

संकल्प यात्रेत मुलांनी पथनाट्य तसेच ढोल वादन करून रंगत आणली. आरोग्य शिबिर तसेच विविध सरकारी योजनांची माहिती व तातडीने विकासच्या योजनांना मंजुरी देणे यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दालने थाटली होती. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, आरोग्य खात्याचे अधिकारी सरकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत