शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:03 IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ बदलाविषयी घडामोडींना वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माझे मंत्रिमंडळ हे कार्यक्षम आहे. सर्वच मंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र, कार्यक्षमतेच्या मुद्द्यावरून कोणालाही हटवले जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून काही बदल करावे लागणार आहेत. एक-दोन नव्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्याच्या आम्ही विचारात आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ बदलाविषयी घडामोडींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून होते. त्यांनी पंतप्रधानांसह पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. गोव्यातील राजकीय परिस्थितीबद्दल त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बदलाविषयी केलेल्या विधानामुळे मंत्री-आमदारांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.

बी. एल. संतोष गोवा दौऱ्यावर आले असता दामू नाईक यांनी मंत्रिमंडळात बदल होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. तसेच प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार करण्याचे कामही हाती घेतले होते. हे रिपोर्ट कार्ड त्यांनी कालच्या दिल्ली भेटीत संतोष यांना सादर केले. दरम्यान, आर्थिक व्यवस्थापनाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी यंदा अपेक्षेपेक्षा अधिक महसूल प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

मागील वर्षी ४ हजार कोटींच्या कर्जाची मर्यादा होती. परंतु केवळ दीड हजार कोटी रुपये कर्ज सरकारने घेतले आहे. यावरून लक्षात यायला पाहिजे की यावेळी वेगळ्या स्रोतातून महसूल प्राप्त झाला आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातही जे काही महसूल प्राप्तीचे स्रोत निश्चित करण्यात आले होते त्या सर्व स्रोतातून अपेक्षित महसूल प्राप्त झालेला आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यास सरकारला यश मिळाले आहे. नवीन महसुलाचे स्रोत निर्माण करण्यास सरकारला यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गैरव्यवस्थापनाचे मुद्दे फेटाळून लावले. सरकारने कमी व्याजदराने कर्जे घेतली आहेत. यापूर्वी घेण्यात आलेल्या कर्जाचा व्याजदर कमी करून घेण्यात आला. साधन सुविधा निर्मितीसाठी अधिक निधी खर्च केला. विरोधकांवर अन्याय होत असल्याच्या आरोपाविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, आमदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निधी वाढवून देण्यात आला आहे हे विरोधक विसरतात.

मेगा प्रकल्पांची मंजुरी सुकाणू समितीच्या हाती

राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत. सरकार गोव्यात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रकल्पांना मान्यता देण्याचे अधिकार आता सुकाणू समितीचा असेल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने संमती दिलेलाच प्रकल्प होऊ शकेल, अन्यथा प्रकल्प होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत