शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

तिळारीचेही पाणी बंद

By admin | Updated: November 22, 2015 01:38 IST

पणजी : तिळारी धरणातून गोव्याला केला जाणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे गोव्याला फटका बसला असून

पणजी : तिळारी धरणातून गोव्याला केला जाणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे गोव्याला फटका बसला असून विशेषत: बार्देस व डिचोली तालुक्यातील शेतीसाठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तिळारीचे कालवे स्वच्छ करणे आणि दुरुस्ती काम करण्यासाठी तिळारीचा पाणीपुरवठा महिनाभर गोव्यासाठी बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे. सध्या तिळारीचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे डिचोली आणि बार्देस तालुक्यातील काही दुर्गम भागांतील नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पर्वरी विभागाने शनिवारी सायंकाळी जाहीर नोटीस जारी केली आहे. तिळारीहून पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत बार्देस व डिचोली तालुक्यातील काही भागांना मर्यादित पाणीपुरवठा असेल, असे बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी म्हटले आहे. अंजुणे धरणात पाण्याची पातळी कमी झाल्याने अगोदरच सत्तरी तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर मर्यादा आली आहे. दरम्यान, डिचोलीचे आमदार नरेश सावळ म्हणाले की, तिळारीहून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे आपण डिचोलीतील सावरधाट, वडावल, खरपाल व साळ अशा पाच-सहा गावांमध्ये पंप बसवून पाण्याचा पुरवठा टाक्यांद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपण मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा केली. ढवळीकर यांनी अभियंत्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी पंप व टाक्या बसविण्यासाठीच्या जागांचे सर्वेक्षणही केले आहे. (खास प्रतिनिधी)