शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

गोव्याबाहेरील वरिष्ठ पोलिसांची बदली करा - मायकल लोबो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 17:32 IST

महसूल प्राप्तीसाठी गोव्यातील पोलिसांना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे सक्तीचे केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे.

ठळक मुद्देमहसूल प्राप्तीसाठी गोव्यातील पोलिसांना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे सक्तीचे केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. आपल्या कॅबिनात बसून हे गोव्याबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचे आदेश देतात. प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याकडून टार्गेट दिले असून दिलेल्या टार्गेटचे पालन न केल्यास त्यांच्या पगारातून १० हजार रुपये कापून घेण्याचा इशाराही दिला असल्याचे लोबो म्हणाले.

म्हापसा - महसूल प्राप्तीसाठी गोव्यातील पोलिसांना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे सक्तीचे केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यांचा रोष पोलीस महासंचालकावर होता; पण त्यांचे थेट नाव न घेता याला जबाबदार असलेल्या वरिष्ठ पोलिसांची गोव्याबाहेर बदली करावी अशी मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी केली आहे. 

कळंगुट मतदारसंघातील पर्रा गावात झालेल्या एका चोरी प्रकरणी पाहणी करतेवेळी पत्रकारांसोबत लोबो बोलत होते. आपल्या कॅबिनात बसून हे गोव्याबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचे आदेश देतात. प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याकडून टार्गेट दिले असून दिलेल्या टार्गेटचे पालन न केल्यास त्यांच्या पगारातून १० हजार रुपये कापून घेण्याचा इशाराही दिला असल्याचे लोबो म्हणाले. कनिष्ठांसमोर पर्याय नसल्याने कायद्याचे पालन करण्यापेक्षा ते फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करू लागले असल्याचे लोबो म्हणाले. या प्रकारात वाढ झाल्यास लोकांचा पोलिसांवर असलेला विश्वास उडून जाईल व राज्यातील गुन्हेगारी प्रकरणात वाढ होणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. 

पोलीस वरिष्ठांकडून होत असलेल्या या गैरप्रकारावर आपण आवाज उठवत असून सरकारातील १२ ही मंत्री मात्र गप्प बसले आहेत. त्यामुळे त्यांनाही अंधारात ठेवून हे प्रकार केले जात असल्याची माहिती लोबो यांनी दिली. मंत्र्यांनी सुद्धा या गैरप्रकारावर आवाज उठवावा अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. या प्रकाराची आपण गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांना तसेच मुख्य सचिवांना पत्र पाठवणार असून पाठवण्यात येणाऱ्या पत्राची प्रत महासंचालकांना दिली जाणार असल्याचे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार असल्याची माहिती दिली. चुकीचे आदेश देणाऱ्यांची बदली करण्याची मागणी पत्राद्वारे केली जाणार असल्याचे सांगितले. 

गुन्हेगारी कमी करण्याचे काम पोलिसांचे असते; पण वरिष्ठांकडून दिलेल्या या चुकीच्या आदेशाचे परिणाम पोलिसांवर व्हायला लागले आहेत. १२ तासाहून जास्त ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी फक्त दंडात्मक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उभे राहणे पसंत केले आहे. सुरक्षेवर मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे उपसभापती मायकल लोबो म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस