शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील समुद्रात पर्यटक बुडून मरण्याचे सत्र नव्याने सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:30 IST

- सदगुरू पाटीलपणजी, दि. 4 -  गोव्यातील उधाणलेल्या आणि उफाळलेल्या समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाशी निगडीत विविध घटकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी अडिचशे मृत्यू हे समुद्रात बूडून होत होते. नंतरच्या काळात सरकारने किनार्‍यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. दृष्टी नावाच्या ...

- सदगुरू पाटीलपणजी, दि. 4 -  गोव्यातील उधाणलेल्या आणि उफाळलेल्या समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाशी निगडीत विविध घटकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी अडिचशे मृत्यू हे समुद्रात बूडून होत होते. नंतरच्या काळात सरकारने किनार्‍यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. दृष्टी नावाच्या यंत्रणेकडून गोव्यातील 105 किलोमीटर लांबीच्या किनार्‍यांवर   चारशे जीवरक्षक ठेवण्यात आले. परिणामी पर्यटक बुडून मरण्याचे प्रमाण घटले होते. मात्र आता पावसाळ्यात समुद्रात पोहायला कुणीच जाऊ नये असे अपेक्षित असतानाही पर्यटक धोका पत्करतात व जीव गमावतात. गेल्या तीन दिवसांत गोव्यातील समुद्रांत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे पर्यटक आणि दोघे गोमंतकीय मच्छीमार आहेत. सोमवारी 4 रोजी नैनितालमधील 22 वर्षीय पर्यटक गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रात बुडाला. रविवारी 3 रोजी हिमाचल प्रदेशातील आशत्रय दत्ता हा 27 वर्षीय पर्यटक कांदोळी समुद्रात बुडाला. हिमाचल प्रदेशमधून पर्यटकांचा एक गटच गोव्यात आला होता.  तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात गोव्यातील दोघे मच्छीमार बुडाले.  अनेकदा किनार्‍यांवर जीवरक्षक पर्यटकांना समुद्रात उतरू नका अशी सूचना करतात पण पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा मद्यपान करूनही पर्यटक समुद्रस्नान करायला जातात व वाहून जातात.  येत्या महिन्यापासून गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू होत आहे व अशावेळीच पर्यटक बुडून मरण्याचे सत्र सुरू झाल्याने संबंधित यंत्रणांनाही चिंता वाटू लागली आहे. 

टॅग्स :Accidentअपघात