शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गोव्याचा पोर्तुगीजकालीन तुरूंग बनणार पर्यटन स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 12:59 IST

अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले.

पणजी : अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या कामाचा आढावा घेऊन कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत हे नुकतेच जाणून घेतले.सिकेरी येथे एकाबाजूने आग्वादचा किल्ला आहे आणि दुसर्‍याबाजूला आग्वाद तुरूंग आहे. पोर्तुगीज राजवट गोव्यात असताना सतराव्या शतकात हे बांधकाम करण्यात आले होते. पोर्तुगीज भाषेत आग्वाद म्हणजे पाणी असलेली जागा. आग्वाद किल्ल्यावर 1864 साली पोर्तुगीजांनी बांधलेला चार मजली दिपस्तंभही आहे. आशिया खंडातील सर्वात जुना दिपस्तंभ म्हणून तो ओळखला जातो.आग्वाद किल्ल्याच्या एका टोकाच्या बाजूला टाटांचे हॉटेल आहे. दुसरीकडे असलेल्या तुरूंगात एकेकाळी गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंसैनिकांना ठेवले जात होते. गोवा 1961 साली मुक्त झाला आणि मग कैदी आणि गुन्हेगारांना या तुरूंगात ठेवले जाऊ लागले. मे 2015 सालापर्यंत तुरूंगाचा वापर झाला. आता तो पूर्ण रिकामा आहे. कैद्यांना कोलवाल येथे बांधण्यात आलेल्या नव्या तुरूंगात स्थलांतरीत करण्यात आले आहे.आता जुन्या आग्वाद किल्ल्याचे रुपांतर पर्यटन स्थळात करण्याची योजना सरकारचे पर्यटन विकास महामंडळ मार्गी लावू पाहत आहे. या कामात कोणत्या अडचणी येतात हे मुख्यमंत्र्यांनी महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल व अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.किल्ल्यावर वस्तूसंग्रहालय तयार करावे. तिथे गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास साकारावा आणि ध्वनी व लेजर शोद्वारे पर्यटकांची मने रिझवावी असे पर्यटन विकास महामंडळाने ठरवले आहे.

टॅग्स :goaगोवा