शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गोव्यात 2 जानेवारीला समुद्राची भरती वाढणार, पर्यटन खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 16:57 IST

येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.

सदगुरू पाटीलपणजी : येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिका:यांनी पर्यटन खात्याला संदेश पाठवून सतर्क केले. समुद्रातील भरतीचे प्रमाण दि. 2 जानेवारी व दि. 31 जानेवारीला खूप वाढू शकते, असे पर्यटन खात्याला कळविले. यामुळे पर्यटन खात्याचे संचालक मिनिन डिसोझा यांनी एक कार्यालयीन निवेदन जारी केले आहे व किनारपट्टीत शॅक्स व्यवसाय करणारे आणि जलक्रिडांसारखे उपक्रम किना-यांवर राबविणारे व्यवसायिक यांना सतर्क केले आहे. समुद्रातील पाणी वाढले तर किना-यावर पूर येईल, त्यामुळे काळजी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असे पर्यटन खात्याने किना-यावरील व्यवसायिकांना कळवले आहे. दि. 2 व दि. 31 जानेवीराला सुपरमून आहे. पृथ्वीला त्यादिवशी चंद्र अतिशय जवळ असेल. त्यामुळे दि. 1, दि. 2 दि. 31 जानेवारी असे तीन दिवस किनारपट्टीतील व्यवसायिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पर्यटन खात्याने दिल्याचे अधिका:यांनी स्पष्ट केले.

दि. 1 व दि. 2 जानेवारीला लाखो पर्यटक गोव्याच्या किनारपट्टीत असतील. नववर्ष साजरे करण्याची धूम दि. 31 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. हजारो पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दृष्टीस पडतात. मालमत्तेची हानी व जीवितहानीही होऊ नये म्हणून पर्यटन खात्याने यावेळी अगोदरच सुपर मुनची कल्पना सर्वाना दिली आहे. दि. 31 जानेवारीलाही बरेच पर्यटक किना:यांवर असतील. उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, हणजुणा, बागा, सिकेरी, दोनापावल, दक्षिण गोव्यातील कोलवा व अन्य किना:यांवर ब:याच जलक्रिडा सध्याच्या दिवसांत चालतात. राज्याच्या पूर्णकिनारपट्टीत साडेतीनशेपेक्षा जास्त शॅक्स (पर्यटन गाळे) आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात अचानक समुद्रातील पाण्याची पातळी खूप वाढली होती व पाणी उत्तर व दक्षिण गोव्यातील शॅकमध्ये जाऊन बरेच नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारच्या कोणत्याही यंत्रणोने आपल्याला पूर्वकल्पना दिली नव्हती अशी तक्रार शॅक व्यवसायिकांनी केली होती. शॅकमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी, अजुनही सरकार नुकसान भरपाई देऊ शकलेले नाही. अजून नुकसानीचा आढावाच घेतला जात आहे.  

टॅग्स :goaगोवा