शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

गोव्यात 2 जानेवारीला समुद्राची भरती वाढणार, पर्यटन खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 16:57 IST

येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.

सदगुरू पाटीलपणजी : येत्या दि. 2 जानेवारी आणि दि. 31 जानेवारीला सुपर मून असून त्यावेळी समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी घ्या, असा सल्ला सरकारच्या पर्यटन खात्याने यावेळी प्रथमच गोव्याच्या किनारपट्टीतील सगळे शॅक्स व्यवसायिक आणि जलक्रिडा व्यवसायिकांना दिला आहे.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिका:यांनी पर्यटन खात्याला संदेश पाठवून सतर्क केले. समुद्रातील भरतीचे प्रमाण दि. 2 जानेवारी व दि. 31 जानेवारीला खूप वाढू शकते, असे पर्यटन खात्याला कळविले. यामुळे पर्यटन खात्याचे संचालक मिनिन डिसोझा यांनी एक कार्यालयीन निवेदन जारी केले आहे व किनारपट्टीत शॅक्स व्यवसाय करणारे आणि जलक्रिडांसारखे उपक्रम किना-यांवर राबविणारे व्यवसायिक यांना सतर्क केले आहे. समुद्रातील पाणी वाढले तर किना-यावर पूर येईल, त्यामुळे काळजी घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाय योजावेत असे पर्यटन खात्याने किना-यावरील व्यवसायिकांना कळवले आहे. दि. 2 व दि. 31 जानेवीराला सुपरमून आहे. पृथ्वीला त्यादिवशी चंद्र अतिशय जवळ असेल. त्यामुळे दि. 1, दि. 2 दि. 31 जानेवारी असे तीन दिवस किनारपट्टीतील व्यवसायिकांनी सतर्क रहावे, असा इशारा पर्यटन खात्याने दिल्याचे अधिका:यांनी स्पष्ट केले.

दि. 1 व दि. 2 जानेवारीला लाखो पर्यटक गोव्याच्या किनारपट्टीत असतील. नववर्ष साजरे करण्याची धूम दि. 31 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. हजारो पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटताना दृष्टीस पडतात. मालमत्तेची हानी व जीवितहानीही होऊ नये म्हणून पर्यटन खात्याने यावेळी अगोदरच सुपर मुनची कल्पना सर्वाना दिली आहे. दि. 31 जानेवारीलाही बरेच पर्यटक किना:यांवर असतील. उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, हणजुणा, बागा, सिकेरी, दोनापावल, दक्षिण गोव्यातील कोलवा व अन्य किना:यांवर ब:याच जलक्रिडा सध्याच्या दिवसांत चालतात. राज्याच्या पूर्णकिनारपट्टीत साडेतीनशेपेक्षा जास्त शॅक्स (पर्यटन गाळे) आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात अचानक समुद्रातील पाण्याची पातळी खूप वाढली होती व पाणी उत्तर व दक्षिण गोव्यातील शॅकमध्ये जाऊन बरेच नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारच्या कोणत्याही यंत्रणोने आपल्याला पूर्वकल्पना दिली नव्हती अशी तक्रार शॅक व्यवसायिकांनी केली होती. शॅकमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी, अजुनही सरकार नुकसान भरपाई देऊ शकलेले नाही. अजून नुकसानीचा आढावाच घेतला जात आहे.  

टॅग्स :goaगोवा