शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा भारत कुणापुढे न झुकणारा; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:03 IST

'ऑपरेशन सिंदूर'मधून भारत महाशक्तिशाली देश सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : आजचा भारत बदललेला आहे. बदललेले संपूर्ण तंत्रज्ञान, त्याहूनही युद्ध तंत्रज्ञानातही बदल झालेला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी एक कार्यकर्ता म्हणून मला नेहमीच एक चिंता लागून राहायची. बदलत्या काळातील युद्ध कसं असेल, बदलते ड्रोन, बदलती टेक्नॉलॉजी याबाबत भारत किती तयार आहे. त्याचे उत्तर 'ऑपरेशन सिंदूर'ने दिले. भारत केवळ पाकिस्तानला ठोकायला तयार झालेला नसून भारतामध्ये तयार झालेले तंत्रज्ञान आज अमेरिका आणि चिनी तंत्रज्ञानालाही मात करणारे आहे. आजचा भारत हा गप्प बसणारा, कोणापुढे झुकणारा नसून वेळ आल्यास अमेरिकेलाही चोख उत्तर देणारा महाशक्तिशाली देश आहे, असे उदगार माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी काढले.

फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये चतुरंग प्रतिष्ठान गोवा शाखेतर्फे श्रवणानंद या उपक्रमाच्या अंतर्गत धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी धर्माधिकारी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर आपले विचार मांडले.

हिंदू-मुस्लिम बांधवात फूट पाडण्याचे षड्यंत्र

धर्माधिकारी पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून गोळीबार केला. हे पाकिस्तानचे ठरवून केलेले षडयंत्र असून भारतातील हिंदू व मुस्लिम यांच्यामध्ये फूट घालण्याचे षडयंत्र होते.

मात्र, भारतातील कोणत्याच हिंदू लोकांनी मुसलमान लोकांना मारले नाही. देशातील हिंदू व मुस्लिम हे एकमेकाचे विरोधक बनले नाही. ही आपली खरी संस्कृती आहे. उलट भारत एक ठोस निर्णय घेऊन पाकिस्तानला योग्य धडा शिकवणार याचा विश्वास प्रत्येक भारतीयाला होता व हा विश्वास ऑपरेशन सिंदूरमधून दिसून आला.

सैनिकाने पाकिस्तानमध्ये जाऊन बदलत्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या हवाई दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. आधुनिक तंत्रज्ञानातून आपली युद्धातील क्षमता दाखवून दिली. भारतीय सैन्य दलाने आपली सक्षमता संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरच्या यशातून दाखवून दिली आहे. यापुढे अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य सतर्क असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.

..तर देशाचे बळ वाढेल

भारताला यापुढेही महाशक्तिशाली बनवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने जागृत राहून हातभार लावण्याची आवश्यकता आहे. आपल्या अवतीभवती कोणत्या गोष्टी घडत आहे यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही घडामोडीकडे उघड डोळ्यांनी पाहून सावध राहिले तर देशाचे बळ वाढेल, असे माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले. यावेळी कार्यक्रमात गोवा विद्या प्रसारक मंडळाचे कृष्णा शेट्ये हे उपस्थित होते.

आज दुसरे व्याख्यान

अविनाश धर्माधिकारी यांचे दुसरे व्याख्यान आज रविवारी २२ रोजी संध्याकाळी स्पर्धात्मक परीक्षा आणि गोव्याचा सहभाग यावर असणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण