शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजपच्या मंत्री आमदारांना घरी पाठवण्याची वेळ: ऊस उत्पादक आंदोलनकर्त्यांना आरजीचा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:00 IST

मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना सांगितले. 

नारायण गावस,पणजी:  राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असून ह्याला अकार्यक्षम सरकार जबाबदार आहे. सरकारने या आधीही इथेनॉल प्लांट सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाला वाव देऊन, न्याय देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनपर्यंत ती आश्वासने पूर्ण झालीच नाही.

डबल इंजिनच्या या सरकारला एक ऊसाचा कारखाना घालता येत नाही. सरकारच्या अशा मंत्री आमदारांना घरी बसविण्याची वेळी आली आहे, असे मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना  सांगितले. 

 राज्य सरकारचे लक्ष आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर असून, राज्यातील हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांना  रस्त्यावर आणून त्यांना निराश करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून शेतकरी हतबल होऊन, आपली जमीन सोडून देतील आणि सरकारला ती जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यास संधी मिळेल. सांगे तालुक्यात आयआयटी च्या नावाखाली जमिनी हडपल्या जातात, काणकोण मध्ये फिल्म सिटी च्या नावाखाली इतर बाजूच्या जमिनी हडपण्यासाठी हे सर्व डावपेच आखण्यात येत असल्याचे मनोज परब म्हणाले.

आज राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे राहिले नाही, गोवेकरांचे राहिले नाही. हे सरकार दिल्लीवासियांचे , मोठ मोठ्या बिल्डर लॉबीचे असून आम्ही आमच्या आरजी पक्षाच्या आमदाराकडून सरकारवर येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दबाव टाकणार असल्याचेही मनोज परब म्हणाले.

 कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर ह्या पक्षाची, ह्या सरकारची  औकात काय आहे ते दिसून येते. आज राज्यात हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम, अपयशी ठरले असून, ह्या सरकारला उन्मळून फेकण्याची वेळ आलेली आहे. ह्या गोवेकर विरोधी बीजेपी सरकारला आणि त्यांचे आमदार, मंत्री - खासदारांना कायमचे घरी बसवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मनोज परब म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण