शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाजपच्या मंत्री आमदारांना घरी पाठवण्याची वेळ: ऊस उत्पादक आंदोलनकर्त्यांना आरजीचा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:00 IST

मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना सांगितले. 

नारायण गावस,पणजी:  राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असून ह्याला अकार्यक्षम सरकार जबाबदार आहे. सरकारने या आधीही इथेनॉल प्लांट सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाला वाव देऊन, न्याय देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनपर्यंत ती आश्वासने पूर्ण झालीच नाही.

डबल इंजिनच्या या सरकारला एक ऊसाचा कारखाना घालता येत नाही. सरकारच्या अशा मंत्री आमदारांना घरी बसविण्याची वेळी आली आहे, असे मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना  सांगितले. 

 राज्य सरकारचे लक्ष आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर असून, राज्यातील हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांना  रस्त्यावर आणून त्यांना निराश करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून शेतकरी हतबल होऊन, आपली जमीन सोडून देतील आणि सरकारला ती जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यास संधी मिळेल. सांगे तालुक्यात आयआयटी च्या नावाखाली जमिनी हडपल्या जातात, काणकोण मध्ये फिल्म सिटी च्या नावाखाली इतर बाजूच्या जमिनी हडपण्यासाठी हे सर्व डावपेच आखण्यात येत असल्याचे मनोज परब म्हणाले.

आज राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे राहिले नाही, गोवेकरांचे राहिले नाही. हे सरकार दिल्लीवासियांचे , मोठ मोठ्या बिल्डर लॉबीचे असून आम्ही आमच्या आरजी पक्षाच्या आमदाराकडून सरकारवर येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दबाव टाकणार असल्याचेही मनोज परब म्हणाले.

 कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर ह्या पक्षाची, ह्या सरकारची  औकात काय आहे ते दिसून येते. आज राज्यात हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम, अपयशी ठरले असून, ह्या सरकारला उन्मळून फेकण्याची वेळ आलेली आहे. ह्या गोवेकर विरोधी बीजेपी सरकारला आणि त्यांचे आमदार, मंत्री - खासदारांना कायमचे घरी बसवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मनोज परब म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण