शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजपच्या मंत्री आमदारांना घरी पाठवण्याची वेळ: ऊस उत्पादक आंदोलनकर्त्यांना आरजीचा पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:00 IST

मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना सांगितले. 

नारायण गावस,पणजी:  राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असून ह्याला अकार्यक्षम सरकार जबाबदार आहे. सरकारने या आधीही इथेनॉल प्लांट सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाला वाव देऊन, न्याय देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनपर्यंत ती आश्वासने पूर्ण झालीच नाही.

डबल इंजिनच्या या सरकारला एक ऊसाचा कारखाना घालता येत नाही. सरकारच्या अशा मंत्री आमदारांना घरी बसविण्याची वेळी आली आहे, असे मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना  सांगितले. 

 राज्य सरकारचे लक्ष आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर असून, राज्यातील हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांना  रस्त्यावर आणून त्यांना निराश करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून शेतकरी हतबल होऊन, आपली जमीन सोडून देतील आणि सरकारला ती जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यास संधी मिळेल. सांगे तालुक्यात आयआयटी च्या नावाखाली जमिनी हडपल्या जातात, काणकोण मध्ये फिल्म सिटी च्या नावाखाली इतर बाजूच्या जमिनी हडपण्यासाठी हे सर्व डावपेच आखण्यात येत असल्याचे मनोज परब म्हणाले.

आज राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे राहिले नाही, गोवेकरांचे राहिले नाही. हे सरकार दिल्लीवासियांचे , मोठ मोठ्या बिल्डर लॉबीचे असून आम्ही आमच्या आरजी पक्षाच्या आमदाराकडून सरकारवर येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दबाव टाकणार असल्याचेही मनोज परब म्हणाले.

 कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर ह्या पक्षाची, ह्या सरकारची  औकात काय आहे ते दिसून येते. आज राज्यात हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम, अपयशी ठरले असून, ह्या सरकारला उन्मळून फेकण्याची वेळ आलेली आहे. ह्या गोवेकर विरोधी बीजेपी सरकारला आणि त्यांचे आमदार, मंत्री - खासदारांना कायमचे घरी बसवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मनोज परब म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण