शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

गोव्यात सामाजिक वनिकरणाचे तीन-तेरा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:35 IST

सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकारची प्रचंड उदासीनता दिसत असून, १00 कोटी रुपये विनावापर ठेवल्याने केंद्राकडून गेल्या काही वर्षात नवीन निधीही मंजूर झालेला नाही.

पणजी : सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकारची प्रचंड उदासीनता दिसत असून, १00 कोटी रुपये विनावापर ठेवल्याने केंद्राकडून गेल्या काही वर्षात नवीन निधीही मंजूर झालेला नाही. २0१४-१५ पासून केंद्र सरकारकडून या योजनेखाली राज्याला पैसेदेखील मिळालेले नाहीत.वनिकरणासाठी जमिनीचा अभाव हे कारण दिले जाते. २३00 हेक्टर जमिनीत वनिकरणाचे उद्दिष्ट घालून देण्यात आले होते ते पूर्ण होऊ शकलेले नाही. एका वरिष्ठ वन अधिका-याच्या म्हणण्यानुसार वनिकरणासाठी जमीनच उपलब्ध नसल्याने निधी विनावापर राहिला. १00 कोटी रुपये अजून तिजोरीत आहेत. गेली काही वर्षे केंद्राने निधी मंजूर केलेला नाही.२00३-0४ चा निधी राज्य सरकारने न वापरल्याने परत गेला. सामाजिक वनिकरणाबाबत राज्य सरकार का उदासीनता दाखवत आहे याबाबत जाणून घेण्यासाठी केंद्रीय वन मंत्रालयाने वेळोवेळी बैठका घेतल्या. परंतु फारशी प्रगती झालेली नाही. निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेगवेगळ्या राज्यांकडून या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला तसेच उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात आले. २00९ साली राष्ट्रीय सामाजिक वनिकरण योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली. जमिनीचा अभाव असल्यास त्याबद्दलही तोडगा काढण्यात आला आहे.राज्यात बेसुमार खाणींमुळे याआधी प्रचंड वृक्षसंहार झालेला आहे. अवघ्या काही खाणमालकांनीच भरपाईसाठी वृक्ष लागवड केली परंतु अनेकांनी नव्याने वृक्ष लागवडीकडे त्याकडे दुर्लक्षच केले. मध्यंतरी मेगा प्रकल्पांसाठीही अनेक ठिकाणी वृक्षसंहार करण्यात आला.सरकारी पातळीवरही सामाजिक वनीकरणाच्या बाबतीत उदासीनता असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.