शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मासळी आयात बंद झाल्याने गोव्यात हजारो बेरोजगार, संघटनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:35 IST

गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन असते, असा दावा राजकारण्यांनी करून गोमंतकीयांमध्ये मोठी भीती निर्माण केली.

पणजी : गोव्याला होणारी रोजची मासळी आयात बंद झाल्यामुळे गोव्यातील सुमारे दहा हजार व्यक्तींच्या रोजगारांवर गदा आली. त्यामुळे गोव्यातील हजारो तरुण बेरोजगार बनले आहेत, असा दावा घाऊक व किरकोळ मासळी विक्रेत्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. 

गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन असते, असा दावा राजकारण्यांनी करून गोमंतकीयांमध्ये मोठी भीती निर्माण केली. फॉर्मेलिनचा वापर माशांसाठी होतच नाही. सरकारने व विरोधकांनीही उगाच भीती निर्माण केली असे इब्राहिम मुसा, शशिकला गोवेकर, फेलिक्स आदी विविध मासळी विक्रेता व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गोव्यातील सर्व मासळी बाजारपेठांमध्ये सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने तातडीने प्रयोगशाळा सुरू कराव्यात आणि रोज सकाळी मासळी तपासली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. सरकार विषयाचा अभ्यास न करता, मासळीची आयात बंद करते. आम्ही सरकारच्या सगळ्या अटी मान्य करण्यास तयार आहोत. आरोग्य मंत्री तसेच आरोग्य सचिवांची आम्ही भेट मागितली पण आम्हाला ते भेटतसुद्धा नाहीत. कुणीच आमदार आमच्याशी फॉर्मेलिनच्या विषयाबाबत चर्चाच करायला येत नाहीत. सगळी मासळी आयात बंद झाल्यामुळे पाच ते दहा हजार व्यक्तींच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांमध्ये भीती व संशय असल्याने ग्राहक मासळी खरेदीसाठी येत नाहीत. मोठी मासळी खरेदी केली जात नाही. हॉटेल व्यवसायिकही अडचणीत येऊ लागले आहेत. सरकारने या स्थितीतवर त्वरित उपाय काढावा, अन्यथा दहा दिवसांनंतर मासळी व्यवसायाशीनिगडीत लोक रस्त्यावर येतील. गोव्यात जी मासळी पकडली जाते ती गोव्यातील ग्राहकांसाठी पुरेशी नाही. आम्ही चाळीस वर्षे मासळी व्यवसायात आहोत. फॉर्मेलिनचे नावही कधी आम्ही ऐकले नव्हते. सरकारने फॉर्मेलिन रसायनाचा पुरवठाच बंद करा, निर्मितीही बंद करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार