शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

'सीएए'विरोधात पणजीत हजारो नागरिकांची धडक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 22:45 IST

‘गोवा अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ने महारॅलीचे आयोजन केले होते.

पणजी : सीएए, एनसीआर आणि एनपीआर कायदा जोपर्यंत मागे घेत नाही. तोपर्यंत एनपीआर किंवा २0२१ च्या जनगणनेसाठी कोणतीही माहिती सरकारला देणार नाही, अशी शपथ या कायद्याला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी हात उंचावून घेतली. 

गोवा अलायन्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी, एनपीआर’ने महारॅलीचे आयोजन केले होते. कांपाल येथील परेड मैदानावरुन दुपारी ३ वाजता रॅली सुरु झाली आणि नंतर या रॅलीचे आझाद मैदानावर जाहीर सभेत रुपांतर झाले. केंद्र सरकारने संमत केलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी पुरुषांबरोबरच महिलाही हजारोंच्या संख्येने जमले होते. आझाद मैदानाच्या बाहेरही चहुबाजूंनी लोक दाटीवाटीने सभा ऐकण्यासाठी उभे होते. 

या सभेत महत्त्वाचे ठरावही संमत करण्यात आले. पोर्तुगिज पासपोर्ट मिळविण्यासाठी भारतीय पासपोर्ट परत करावा लागतो. अशा लोकांना ओसीआय कार्ड दिले जाते. वरील कायद्यामुळे गोव्यातील ओसीआय कार्डधारक अडचणीत आले आहेत त्यामुळे या कायद्याला कडाडून विरोध करण्यात आला.  

गोव्यात जमिनी बळकावण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. राज्यातील वंचित समाजाला याचे परिणाम आधीच भोगावे लागत असताना आता या कायद्यामुळे त्यात आणखी भर पडेल. काही नागरिक संशयाच्या घे-यात येऊन त्यांची स्थानबद्धता केंद्रांमध्ये अथवा कारावासात रवानगी होऊ शकते. त्यांच्या मूलभूत नागरी हक्कांवर गदा येईल. विकासाच्या नावाखाली विध्वंसक धोरणे राबवली जात आहेत. त्याविरुध्द आवाज उठविणे शक्य होणार नाही, यामुळे हा कायदा नकोच, असा ठराव घेण्यात आला. 

केंद्राने संमत केलेला हा कायदा घटनेच्या मूळ तत्त्वांशी फारकत घेणारा आहे आणि जे आधीच शोषित, उपेक्षित आणि असुरक्षित आहोत त्यांना आणखी असुरक्षित बनविणारा आहे त्यामुळे हा कायदा नकोच. कुठलाही कायदा, जो प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या धर्म, जात, लिंग, वर्ग, लैंगिकता, शारिरीक क्षमता, वय पेशा यापैकी कुठल्याही आधारावर भेदभाव करणारा आहे त्याला आमचा विरोध आहे, असाही ठराव घेण्यात आला. आयोजन समन्वयक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत यांनी ठराव वाचून दाखवला तसेच उपस्थितांना शपथ दिली. 

सर्व पंचायतींना विरोधाचे ठराव घेण्याचे आवाहन सीएए-एनपीआर-एनआरसी कायद्याला विरोध करणारे ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावेत, असे आवाहन यावेळी आयोजकांनी केले. कुडका-बांबोळी पंचायतीने असा ठराव सर्वप्रथम घेतलेला आहे. आजोशी-मंडूर पंचायतींमध्येही असा ठराव घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. अन्य पंचायतींनीही विरोधाचे ठराव घ्यावे, अशी हांक गोवा अगेन्स्ट सीएएचे रामा काणकोणकर यांनी दिली. 

आर्चबिशपवरील विधानांचा समाचार आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांच्याविरोधात विधाने केलेल्या सीएए समर्थकांचा या सभेत कडक शब्दात समाचार घेण्यात आला. आर्चबिशप हे आधी या देशाचे नागरिक आहेत. त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कायदा मागे घेण्याच्या त्यांच्या विधानाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केल्याचा आरोप सांताक्रु झचे कार्यकर्ते आर्थुर डिसोझा यांनी केला.  

टॅग्स :goaगोवाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक