शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अतिरिक्त वीज वापरणाऱ्यांना खात्याचा शॉक, वीज खात्याकडून कारवाई इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 11:41 IST

अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे.

पणजी - अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करण्याचा  इशाराही दिला आहे.  वीज ग्राहकांनी ज्या प्रमाणात वीजेची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार त्यांना वीज जोडण्या देण्यात येतात. कमी क्षमतेची वीज जोडणी असलेले ग्राहकही अनेकवेळा अतिरिक्त वीज वापरत असल्याचे आढळून आले आहे.

राज्यात होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचे हे एक काम असल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंते एन एन रेड्डी यांनी म्हटले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज खात्याने आवश्यकतेनुसार वीजपूरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना अतिरिक्त वीजेची गरज लागते त्यांनी अजपासून ३० दिवसांच्या आत अतिरिक्त वीजेची मागणी करणारे अर्ज वीज खात्यात सादर करावेत अशी सूचना करण्यात आली आहे.

एखाद्या भागात किती वीजेची नेमकी आवश्यकता आहे याचा अंदाज खात्याला यामुळे मिळणार आहे. त्यामुळे तितक्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर त्या भागात बसवून वीज पूरवठा करणे खात्याला शक्य होणार आहे.  ३० दिवसांच्या आत ज्या ग्राहकांनी अतिरिक्त वीज जोडणीसाठी अर्ज केला नसेल आणि त्यांच्या वीज बिलात अतिरिक्त वीज खर्च केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तशी जाहिरातही खात्याकडून जारी करण्यात आली आहे. 

अतिरिक्त वीज वापरण्याचे प्रकार सर्रास घडत नसले तरी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे खात्याला आढळून आले आहे. देण्यात आलेले वीजेचे प्रमाण  व  प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेली वीज यात फार मोठा तफावत आढळून आली आहे. त्यामुळे वीज खात्याने हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा