शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अतिरिक्त वीज वापरणाऱ्यांना खात्याचा शॉक, वीज खात्याकडून कारवाई इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 11:41 IST

अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे.

पणजी - अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करण्याचा  इशाराही दिला आहे.  वीज ग्राहकांनी ज्या प्रमाणात वीजेची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार त्यांना वीज जोडण्या देण्यात येतात. कमी क्षमतेची वीज जोडणी असलेले ग्राहकही अनेकवेळा अतिरिक्त वीज वापरत असल्याचे आढळून आले आहे.

राज्यात होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचे हे एक काम असल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंते एन एन रेड्डी यांनी म्हटले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज खात्याने आवश्यकतेनुसार वीजपूरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना अतिरिक्त वीजेची गरज लागते त्यांनी अजपासून ३० दिवसांच्या आत अतिरिक्त वीजेची मागणी करणारे अर्ज वीज खात्यात सादर करावेत अशी सूचना करण्यात आली आहे.

एखाद्या भागात किती वीजेची नेमकी आवश्यकता आहे याचा अंदाज खात्याला यामुळे मिळणार आहे. त्यामुळे तितक्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर त्या भागात बसवून वीज पूरवठा करणे खात्याला शक्य होणार आहे.  ३० दिवसांच्या आत ज्या ग्राहकांनी अतिरिक्त वीज जोडणीसाठी अर्ज केला नसेल आणि त्यांच्या वीज बिलात अतिरिक्त वीज खर्च केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तशी जाहिरातही खात्याकडून जारी करण्यात आली आहे. 

अतिरिक्त वीज वापरण्याचे प्रकार सर्रास घडत नसले तरी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे खात्याला आढळून आले आहे. देण्यात आलेले वीजेचे प्रमाण  व  प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेली वीज यात फार मोठा तफावत आढळून आली आहे. त्यामुळे वीज खात्याने हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा