शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

अतिरिक्त वीज वापरणाऱ्यांना खात्याचा शॉक, वीज खात्याकडून कारवाई इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 11:41 IST

अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे.

पणजी - अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करण्याचा  इशाराही दिला आहे.  वीज ग्राहकांनी ज्या प्रमाणात वीजेची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार त्यांना वीज जोडण्या देण्यात येतात. कमी क्षमतेची वीज जोडणी असलेले ग्राहकही अनेकवेळा अतिरिक्त वीज वापरत असल्याचे आढळून आले आहे.

राज्यात होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचे हे एक काम असल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंते एन एन रेड्डी यांनी म्हटले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज खात्याने आवश्यकतेनुसार वीजपूरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना अतिरिक्त वीजेची गरज लागते त्यांनी अजपासून ३० दिवसांच्या आत अतिरिक्त वीजेची मागणी करणारे अर्ज वीज खात्यात सादर करावेत अशी सूचना करण्यात आली आहे.

एखाद्या भागात किती वीजेची नेमकी आवश्यकता आहे याचा अंदाज खात्याला यामुळे मिळणार आहे. त्यामुळे तितक्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर त्या भागात बसवून वीज पूरवठा करणे खात्याला शक्य होणार आहे.  ३० दिवसांच्या आत ज्या ग्राहकांनी अतिरिक्त वीज जोडणीसाठी अर्ज केला नसेल आणि त्यांच्या वीज बिलात अतिरिक्त वीज खर्च केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तशी जाहिरातही खात्याकडून जारी करण्यात आली आहे. 

अतिरिक्त वीज वापरण्याचे प्रकार सर्रास घडत नसले तरी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे खात्याला आढळून आले आहे. देण्यात आलेले वीजेचे प्रमाण  व  प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेली वीज यात फार मोठा तफावत आढळून आली आहे. त्यामुळे वीज खात्याने हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :electricityवीजgoaगोवा