शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

चौघा मंत्र्यांना वगळण्याचा विचार?; दिल्लीत खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:34 IST

चौघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याजागी नव्या चार आमदारांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याच्या मंत्रिमंडळात लोकसभा निवडणुकीपूर्वी फेररचना करण्याचा विचार दिल्लीतील भाजप नेत्यांच्या वर्तुळात जोर धरू लागला आहे. राज्यातील काही मंत्र्यांना याची कुणकुण लागली आहे. चौघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याजागी नव्या चार आमदारांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

एका मंत्र्याला दिल्लीत बोलावून घेतले गेले आहे. तो राज्यात परतल्यानंतर दुसऱ्या एका मंत्र्याला दिल्लीत बोलावून घेतले जाईल. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना गोव्यात निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी बनविले गेले आहे. चंद्रशेखर यांनी अलिकडेच पणजीत सर्व मंत्री आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी दक्षिणेची जागा जिंकणे सहज सोपे नाही, खूप कष्ट करावे लागतील, असे विधान मंत्री नीलेश काब्राल यांनी केले होते. त्यामुळे काब्राल यांना दिल्लीत बोलावून घेतले गेले. काब्राल यांनी काल दिल्ली गाठली.

आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह अन्य दोघांना मंत्रीपद दिले जाईल व विद्यमान चौघा मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, अशी चर्चा आमदारांत रंगली आहे. अर्थात यात किती तथ्य आहे ते दिल्लीतील भाजप नेतेच सांगू शकतील. संकल्प आमोणकर यांनादेखील मंत्रीपद दिले जाऊ शकते.

ज्यांना आपण भाजपमध्ये घेताना मंत्रीपद देण्याची ग्वाही दिली होती, त्या सर्वांना मंत्रीपद देऊया असे दिल्लीत भाजप नेत्यांच्या स्तरावर ठरू लागले आहे. मंत्रीपदे दिली नाही तर भाजपच्या ज्येष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या शब्दावरील विश्वासच गळून पडेल असे नेत्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रात्री मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे दोन मंत्री सध्या दिल्लीत आहेत. एका मंत्र्याने भाजपच्या मुख्यालयास रात्री भेट दिली. मंत्री विश्वजीत राणे हे देखील इंदोरमधील सगळे प्रचार काम संपवून दिल्लीत दाखल झाले आहेत. पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल, अशी माहिती मिळाली.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण