शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

किनारपट्टी स्वच्छतेत भ्रष्टाचार होणार नाही - आजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:18 IST

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे.

पणजी - किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी (17 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामासाठी निविदा जारी केली गेली आहे. समुद्रकिनारी हे पर्यटन खात्याच्या अखत्यारित येतात. त्यामुळे किनारे स्वच्छ करण्याचे काम पर्यटन खातेच करून घेईल. यापूर्वीच्या काळात किनारपट्टी स्वच्छतेच्या कंत्रटाचा विषय खूप गाजलेला आहे. आपल्याला त्याविषयीची सगळी कल्पना आहे. आमचा व्यवहार मात्र पारदर्शक असेल, असे मंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने घन कचरा व्यवस्थापन खातेही स्थापन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही आहे. आता किनारपट्टी स्वच्छतेचे काम पर्यटन खाते की ते घन कचरा व्यवस्थापन खाते करील अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. एकाच कामासाठी दोन-तीन यंत्रणा सरकार स्थापन करते की काय असाही प्रश्न सरदेसाई यांनी केला. पर्यटन खाते अस्तित्वात असताना पर्यटन विकास महामंडळही आहे व महामंडळाचे काम सुरू असतानाच सरकार राज्य पर्यटन प्रोत्साहन मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगते. सरकारला एकाच कामासाठी आणखी  किती मंडळे हवी आहेत अशी विचारणा विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

केपीएमजीची चौकशी करा 

पर्यटन मास्टर प्लॅनचा मसुदा तयार करताना केपीएमजी या सल्लागार कंपनीने फक्त कॉपी-पेस्ट करण्याचेच काम केले आहे आणि या कामासाठी सरकारने अगोदरच केपीएमजीला तीन कोटी रुपये फेडले असल्याचे भाजपाचे आमदार ग्लेन टीकलो म्हणाले होते. तोच धागा पकडून विजय सरदेसाई यांनी हा गंभीर विषय असल्याचे सांगितले व या तीन कोटी प्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. केपीएमजी काहीही करील व आम्ही गप्प राहू असे घडणार नाही, आम्ही दखल घेऊ, असे मंत्री आजगावकर यांनी नमूद केले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा