शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

किनारपट्टी स्वच्छतेत भ्रष्टाचार होणार नाही - आजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 18:18 IST

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले आहे.

पणजी - किनारपट्टी स्वच्छतेच्या कामाबाबत कोणतीच अंदाधुंदी होणार नाही आणि भ्रष्ट व्यवहारही होणार नाही, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी (17 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.

किनारपट्टी स्वच्छतेच्या कामासाठी निविदा जारी केली गेली आहे. समुद्रकिनारी हे पर्यटन खात्याच्या अखत्यारित येतात. त्यामुळे किनारे स्वच्छ करण्याचे काम पर्यटन खातेच करून घेईल. यापूर्वीच्या काळात किनारपट्टी स्वच्छतेच्या कंत्रटाचा विषय खूप गाजलेला आहे. आपल्याला त्याविषयीची सगळी कल्पना आहे. आमचा व्यवहार मात्र पारदर्शक असेल, असे मंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने घन कचरा व्यवस्थापन खातेही स्थापन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र मंत्रीही आहे. आता किनारपट्टी स्वच्छतेचे काम पर्यटन खाते की ते घन कचरा व्यवस्थापन खाते करील अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. एकाच कामासाठी दोन-तीन यंत्रणा सरकार स्थापन करते की काय असाही प्रश्न सरदेसाई यांनी केला. पर्यटन खाते अस्तित्वात असताना पर्यटन विकास महामंडळही आहे व महामंडळाचे काम सुरू असतानाच सरकार राज्य पर्यटन प्रोत्साहन मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगते. सरकारला एकाच कामासाठी आणखी  किती मंडळे हवी आहेत अशी विचारणा विजय सरदेसाई यांनी केली आहे. 

केपीएमजीची चौकशी करा 

पर्यटन मास्टर प्लॅनचा मसुदा तयार करताना केपीएमजी या सल्लागार कंपनीने फक्त कॉपी-पेस्ट करण्याचेच काम केले आहे आणि या कामासाठी सरकारने अगोदरच केपीएमजीला तीन कोटी रुपये फेडले असल्याचे भाजपाचे आमदार ग्लेन टीकलो म्हणाले होते. तोच धागा पकडून विजय सरदेसाई यांनी हा गंभीर विषय असल्याचे सांगितले व या तीन कोटी प्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. केपीएमजी काहीही करील व आम्ही गप्प राहू असे घडणार नाही, आम्ही दखल घेऊ, असे मंत्री आजगावकर यांनी नमूद केले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा