शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात केव्हाही बदल होऊ शकतो!; प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे पुन्हा संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:12 IST

पक्षशिस्त पाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काही दिवसांपूर्वीच दिगंबर नाईक व रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. चतुर्थीच्या दिवशीच त्यांना खातेही देण्यात आले. त्याचदिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी येत्या काळात आणि बदल शक्य असल्याचे संकेत दिले होते. आता पुन्हा दामू नाईक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली आहे. हा बदल केव्हाही होऊ शकतो, तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्री असे बदल केव्हाही करू शकतात, असे सांगून टाकले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. केव्हा बदल होणार? असे विचारले असता ते म्हणाले की, हे बदल होण्याची शक्यता जानेवारीतही आहे आणि मार्चमध्येही आहे. यावेळी नाईक यांनी पक्षाच्या शिस्तीला तडा जाणाऱ्या काही घटना घडल्याचे मान्यही केले. त्यासाठी नवीन आमदारांना भाजपची कार्यपद्धत तितकी समजलेली नसावी. परंतु ही कार्यपद्धती आणि शिस्त सर्वांना समजून घ्यावीच लागेल. कारण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हाल? असे कधी वाटले होते का या प्रश्नावर दामू नाईक म्हणाले की, २००४ मध्ये इडीसी पाटो येथे पक्षाचे मोठे अधिवेशन झाले होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी मला म्हटले होते की तू कधी तरी पक्षाचा अध्यक्ष होणार. आज त्यांच्या त्या शब्दांची प्रकर्षाने आठवण होते. निष्ठेने पक्षाचे काम करत राहिलो. अनेक अडचणी आल्या, जय-पराजय पाहिले. पण पक्षाचे काम थांबवले नाही. त्यामुळेच आज प्रदेशाध्यक्ष बनू शकलो, असे नाईक यांनी सांगितले.

भाजप अल्पसंख्याकाविरोधात असल्याचा बनाव आता चालणार नाही. तसे असते तर भाजप सरकारात अल्पसंख्याक मंत्री बनलाच नसता, असे नाईक सांगतात. अॅन्टी इन्कंबन्सीचा फार बाऊ करण्याचे कारण नसल्याचे ते सांगतात. कारण या सरकारने कामे केली आहेत. सरकारला बदनाम करणारे लोक हे विविध कारस्थाने रचून ते करीत आहेत. परंतु त्याचा पक्षावर परिणाम होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुरावलेल्यांना पुन्हा सोबत घेऊ

गेल्या काही वर्षांत काही कारणांमुळे पक्षाचे अनेक निष्ठावंत पक्षापासून दूर गेले आहेत. मी प्रदेशाध्यक्ष होताच अशा सर्व लोकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या. दुरावलेली ही माणसे पुन्हा पक्षात आल्यास त्यांचे स्वागतच करीन. कारण ते भाजपचे कार्ययकर्ते आहेत. उत्पल पर्रीकर, दयानंद मांद्रेकर ही मंडळी पक्षापासून दूर गेलेली नाहीत, असेही नाईक म्हणाले.

मुख्यमंत्रीच पक्षाचा चेहरा

केंद्रात आपले सरकार आहे आणि राज्य सरकार नाही, ही सल होती. त्यामुळे गोव्यातही सरकार स्थापन करण्याचा निश्चय आम्ही केला होता. त्या काळात भाजपची भूमिका ज्यांना पटली ते काँग्रेसचे आमदार आमच्याबरोबर येण्यास तयार झाले आणि त्यांना घेऊन आम्ही सरकार केले. त्यावेळी ती पक्षाची गरजही होती. आमदार, मंत्री कुणीही असले तरी मुख्यमंत्री हे सरकारचा चेहरा आहेत, असे ते म्हणाले. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण