शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:00 IST

वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोळशाचा राज्याला काहीच उपयोग होणार नाही. राज्य आपले आहे आणि आपल्या राज्याचा हिताचा निर्णय आपणच घेतला पाहिजे. जर मी उद्या मुख्यमंत्री झालो तर राज्यातील कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करेन असे मत गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. या गोष्टीवर केंद्रावर अवलंबून राहणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.

सरदेसाई म्हणाले की, 'कोळशाचा फायदा केवळ हफ्ते घेणाऱ्यांनाच होत आहे. त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून हे सरकार कोळसा आणण्यावर भर देत आहे. राज्याला कोळशाची गरजच नाही. जेवढा आवश्यक आहे, तेवढा ठिक. पण यात वाढ करणे हे राज्याला परवडणार नाही. यातून पर्यटन संपुष्टात येईल. आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कोळसाविरोधी धोरण राबविण्याचे आश्वासन प्रामुख्याने असेल. या विषयाला पाठिंबा देऊन जो कोणी सरकार स्थापन करेल तर त्यांनादेखील आमचा पूर्ण पाठिंबा राहील' असेही सरदेसाई यांनी सांगितले.

सरदेसाई म्हणाले की, 'आमचो आवाज विजय अंतर्गत आम्ही जेव्हा वास्कोमध्ये गेलो तेव्हा कोळशाचे दुःष्परीणाम आम्हाला जाणवले. जे सामाजिक कार्यकर्ते कॅसिनो नको म्हणत होते, ते मला भेटून सांगायला लागले की, वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या. व्यवसाय उद्ध्वस्त झालेच. पण आरोग्यही लोकांचे संपले.'

राज्यातही व्होटचोरी आहेच...

काँग्रेसने, राहुल गांधी यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी खऱ्या होत आहेत. 'व्होट चोरी' हा प्रकार केवळ केंद्र स्तरावरच नव्हे तर राज्यातही असे घडले आहे. येथे वेगळ्या माध्यमातून मते फोडण्यात येत आहेत. आमचा पक्ष स्थानिक असूनही सध्याच्या काळात मी सर्व ४० जागांवर उमेदवार उभे करू शकत नाही. तर मग बाहेरील पक्ष येथे येऊन एकाचवेळी ४० उमेदवार कसे उभे करतील? असा सवाल सरदेसाई यांनी केला. हे केवळ मते फोडण्याचे कारस्थान आहे. राज्यातील लोक हुशार झाले आहेत, त्यांना हे फोडाफोडी राजकारणाचे गणित बरोबर कळते. कुठला पक्ष उमेदवार उभे करून इतर कोणत्या पक्षाला फायदा करून देईल हेही लोकांना कळू लागले आहे. हीदेखील एक प्रकारची व्होटचोरी आहे. यावर वेळ येईल तेव्हा मी बोलेन, असेही सरदेसाई म्हणाले.

पण काँग्रेसने अपेक्षाभंग केला

आमदार सरदेसाई म्हणाले की, पक्षात अनेक नवे लोक येत आहेत. यात काँग्रेसचेदेखील काही नेते आहेत. पण मुद्दामहून आम्ही काँग्रेसचे नेते फोडून आणले नाहीत, तर जे कुणी काँग्रेसपासून लांब गेले किंवा सक्रिय नाहीत असे नेते आमच्या पक्षात येत आहेत. तेदेखील स्वतःहून येताहेत. आम्ही २०२२ सोबत काँग्रेससोबत युती करुन निवडणूक लढवली. आणि आताही सोबत आहोत. पण, काँग्रेसच्या नेतृत्वात एकता दिसत नाही. प्रमुख पक्ष सरकारला घेरण्यात अपयशी ठरला. यातून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण