शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:00 IST

वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोळशाचा राज्याला काहीच उपयोग होणार नाही. राज्य आपले आहे आणि आपल्या राज्याचा हिताचा निर्णय आपणच घेतला पाहिजे. जर मी उद्या मुख्यमंत्री झालो तर राज्यातील कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करेन असे मत गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. या गोष्टीवर केंद्रावर अवलंबून राहणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.

सरदेसाई म्हणाले की, 'कोळशाचा फायदा केवळ हफ्ते घेणाऱ्यांनाच होत आहे. त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून हे सरकार कोळसा आणण्यावर भर देत आहे. राज्याला कोळशाची गरजच नाही. जेवढा आवश्यक आहे, तेवढा ठिक. पण यात वाढ करणे हे राज्याला परवडणार नाही. यातून पर्यटन संपुष्टात येईल. आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कोळसाविरोधी धोरण राबविण्याचे आश्वासन प्रामुख्याने असेल. या विषयाला पाठिंबा देऊन जो कोणी सरकार स्थापन करेल तर त्यांनादेखील आमचा पूर्ण पाठिंबा राहील' असेही सरदेसाई यांनी सांगितले.

सरदेसाई म्हणाले की, 'आमचो आवाज विजय अंतर्गत आम्ही जेव्हा वास्कोमध्ये गेलो तेव्हा कोळशाचे दुःष्परीणाम आम्हाला जाणवले. जे सामाजिक कार्यकर्ते कॅसिनो नको म्हणत होते, ते मला भेटून सांगायला लागले की, वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या. व्यवसाय उद्ध्वस्त झालेच. पण आरोग्यही लोकांचे संपले.'

राज्यातही व्होटचोरी आहेच...

काँग्रेसने, राहुल गांधी यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी खऱ्या होत आहेत. 'व्होट चोरी' हा प्रकार केवळ केंद्र स्तरावरच नव्हे तर राज्यातही असे घडले आहे. येथे वेगळ्या माध्यमातून मते फोडण्यात येत आहेत. आमचा पक्ष स्थानिक असूनही सध्याच्या काळात मी सर्व ४० जागांवर उमेदवार उभे करू शकत नाही. तर मग बाहेरील पक्ष येथे येऊन एकाचवेळी ४० उमेदवार कसे उभे करतील? असा सवाल सरदेसाई यांनी केला. हे केवळ मते फोडण्याचे कारस्थान आहे. राज्यातील लोक हुशार झाले आहेत, त्यांना हे फोडाफोडी राजकारणाचे गणित बरोबर कळते. कुठला पक्ष उमेदवार उभे करून इतर कोणत्या पक्षाला फायदा करून देईल हेही लोकांना कळू लागले आहे. हीदेखील एक प्रकारची व्होटचोरी आहे. यावर वेळ येईल तेव्हा मी बोलेन, असेही सरदेसाई म्हणाले.

पण काँग्रेसने अपेक्षाभंग केला

आमदार सरदेसाई म्हणाले की, पक्षात अनेक नवे लोक येत आहेत. यात काँग्रेसचेदेखील काही नेते आहेत. पण मुद्दामहून आम्ही काँग्रेसचे नेते फोडून आणले नाहीत, तर जे कुणी काँग्रेसपासून लांब गेले किंवा सक्रिय नाहीत असे नेते आमच्या पक्षात येत आहेत. तेदेखील स्वतःहून येताहेत. आम्ही २०२२ सोबत काँग्रेससोबत युती करुन निवडणूक लढवली. आणि आताही सोबत आहोत. पण, काँग्रेसच्या नेतृत्वात एकता दिसत नाही. प्रमुख पक्ष सरकारला घेरण्यात अपयशी ठरला. यातून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण