शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चर्चिलचा काळ गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 07:28 IST

काही राजकीयदृष्ट्या मतदारसंघात कमकुवत झाले आहेत; पण त्यांना पुन्हा आमदार होण्याची खुमखुमी आहे. 

विधानसभा निवडणुकीचा काळ जवळ येतोय. फक्त आठ महिन्यांचा कालावधी प्रत्येक मंत्री, आमदाराच्या हाती आहे. डिसेंबरअखेरीस निवडणूक आचारसंहिता आली की, मग सगळेच ठप्प होईल. आपल्या मतदारसंघात अधिकाधिक कामे करून घेण्यासाठी काही आमदार व मंत्री धडपडत आहेत. यापूर्वी जे निवडणुका हरले आहेत, त्यांच्यापैकी काहींना आपण पुन्हा आमदार व्हायलाच हवे, असे वाटते. काही राजकीयदृष्ट्या मतदारसंघात कमकुवत झाले आहेत; पण त्यांना पुन्हा आमदार होण्याची खुमखुमी आहे. 

दयानंद मांद्रेकरांपासून महादेव नाईकांपर्यंत किंवा इजिदोर फर्नांडिसांपासून ग्लेन तिकलोंपर्यंत अनेक राजकारणी नव्याने बाशिंग बांधू लागले आहेत. यात मिकी पाशेको, किरण कांदोळकर, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर, बाबू कवळेकर आदी अनेकांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व माजी खासदार चर्चिल आलेमाव यांचा टाइम पास होत नाही, असे दिसते. ते अधूनमधून उलटसुलट विधाने करत आहेत. काल पुन्हा त्यांनी तोंड उघडले. आपल्याला कुंकळ्ळीतील काही लोक येऊन भेटले. त्या लोकांनी आपल्याला तू हवा आहेस, असे सांगितले, असा चर्चिलचा दावा आहे. म्हणजे कुंकळ्ळीतून तुम्ही लढा आणि आमदार व्हा, असे आपल्याला एका देवस्थानच्या माणसांसह अनेकांनी सांगितले असल्याचे चर्चिल स्वतःच जाहीर करतात. 

चर्चिल किंवा रमाकांत खलप किंवा दयानंद नार्वेकर यांच्या राजकारणाचा काळ यापूर्वीच मागे पडला आहे. नार्वेकर यांनी काळाची पावले ओळखून योग्यवेळी निवृत्ती पत्करली आहे. माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनीही योग्यवेळी वाऱ्याची दिशा ओळखून सक्रिय राजकारणाला 'गुडबाय' केले. काँग्रेस पक्ष सोडून 'टीएमसी' मध्ये जाणे व तिथे अवघ्या काही काळासाठी राज्यसभा खासदार होणे ही लुईझिन यांची घोडचूक होती. त्यांना अपमानित होऊनच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा आणि खासदारकीचा निरोप घ्यावा लागला. जे राजकीय नेते शेवटपर्यंत काँग्रेस पक्षात राहिले, त्यांना सन्मानाने बाजूला होता आले. गोव्यातील ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यांचे राजकारणातील महत्त्वही नंतर खूप कमी झाले.

आता राजकारण पूर्णपणे बदलले आहे. चोवीस तास लोकसंपर्कात राहावे लागते. कायम लोकांची कामे करतानाच लोकांसाठी खर्चदेखील करावा लागतो. सध्या क्रिकेट टुर्नामेन्टचा काळ सुरू आहे. अनेकजण आमदार चषक स्पर्धा आयोजित करत आहेत. वय व आरोग्य ज्यांना साथ देतेय, तेच आजचे राजकारण करू शकतात. धनशक्तीशिवाय राजकारण सुरू ठेवता येत नाही. राजकीयदृष्ट्या अनेक वर्षे जे टिकले त्यात दिगंबर कामत, माविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर यांचा समावेश होतो. 

कामत वर्ष १९९४ मध्ये प्रथम निवडून आले होते, ते कधीच पराभूत झाले नाहीत. वर्ष ९४ मध्ये जिंकून मग कधीच न हरलेला असा एकही आमदार आता विधानसभेत नाही. माविन आणि सुभाष शिरोडकर तर पूर्वीपासून निवडणुका जिंकत आहेत. दोनवेळा ते दोघे पराभूत झाले, तरी पुन्हा मुसंडी मारून वर आले व चांगलेच स्थिरावले. या दोन्ही नेत्यांकडे प्रचंड राजकीय अनुभव आहे; पण दोघेही कधी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. 

सुदिन ढवळीकर वर्ष १९९९ पासून सलगपणे जिंकून येत आहेत. आज देखील ते मडकई मतदारसंघात भक्कमपणे पाय रोवून उभे आहेत. तेही कधी मुख्यमंत्री झाले नाहीत. याउलट चर्चिल आलेमाव यांना मात्र १९ दिवसांसाठी 'सीएम' होण्याची संधी मिळाली होती. ९०च्या दशकात गोव्यात पुलोआचा प्रयोग झाला तेव्हा रमाकांत खलपांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले होते. खरे म्हणजे खलप त्या पदासाठी पात्र होते, योग्य होते. मात्र, त्या वेळी स्वर्गीय शशिकला काकोडकर वगैरेंनी चर्चिल यांचे नाव सुचविले. काल देखील मीडियाशी बोलताना चर्चिल म्हणाले की, ताई काकोडकर, विनयकुमार उसगावकर वगैरेंना मी जास्त विश्वासू वाटलो, त्यामुळेच मला मुख्यमंत्रिपद दिले गेले होते.

चर्चिल यांना वाटते की, आपण बाणावलीऐवजी कुंकळ्ळीतून लढावे; पण कुंकळ्ळीत युरी आलेमाव हे त्यांच्याच कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे काल चर्चिलने पुन्हा नवे विधान केले की, मी अजून निर्णय घेतलेला नाही, आरोग्याची स्थिती पाहून मग निर्णय घेईन. वास्तविक चर्चिल यांनी आता विश्रांती घेतलेलीच बरी, असे आजच्या युवा पिढीला वाटत असावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Churchill's Era Over: Veteran Politicians Eye Goa Elections

Web Summary : Goa's political landscape sees veterans like Churchill Alemao contemplating comebacks as elections loom. While some adapt to changing dynamics, others face dwindling relevance. Younger leaders prioritize constant public engagement and financial investment in constituents.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण