शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 07:56 IST

काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅलीकाढून जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाने देशातील जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी केवळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दडपणाखाली घेतला आहे. हा एका प्रकारे काँग्रेसचा नाही तर जनतेचा विजय आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेताच, काँग्रेसने राजधानीत काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढत विजयाचा जल्लोष केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत, आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, व काँग्रेसचे इतर ओबीसी समिती, अनुसूचित जाती-जमाती समितीचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन मिठाई वाटली.

काँग्रेसने गेले कित्येक वर्षे जातीनिहाय जनगणना करावी हा विषय लावून धरला होता. राहुल गांधींनी वारंवार केंद्र सरकारला याची आठवण करून दिली होती. आम्ही जेव्हा ही मागणी करायचो, तेव्हा भाजपवाले आमची मस्करी करायचे. आता शेवटी केंद्र सरकारने आमच्या मागण्यापुढे गुडघे टेकलेच आहेत. मात्र आम्ही यावर न थांबता याची अमंलबजावणी होईपर्यंत यावर लक्ष ठेवणार आहोत, असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.

या रॅलीमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलनाची गरज का भासली याविषयी स्पष्ट केले. आंदोलनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना खूप दिवसांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची संधी मिळाली. त्यांनी यावेळी घोषणा देत लक्ष वेधून घेतले.

गांधी सर्वसामान्यांचे नेते

संसदेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी हे लहान लोकांचे नेते आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेदरम्यान त्यांनी ४५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. महात्मा गांधीनंतर केवळ राहुल गांधीने असे केले आहे. यातून त्यांना वाटले होते की मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. या अनुषंगाने जनगणनेची मागणी त्यांनी केली होती. यापुढे देखील आम्ही सरकारला योग्य दिशा दाखविण्यास काम करणार आहोत, असे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस