शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 07:56 IST

काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅलीकाढून जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाने देशातील जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी केवळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दडपणाखाली घेतला आहे. हा एका प्रकारे काँग्रेसचा नाही तर जनतेचा विजय आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेताच, काँग्रेसने राजधानीत काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढत विजयाचा जल्लोष केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत, आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, व काँग्रेसचे इतर ओबीसी समिती, अनुसूचित जाती-जमाती समितीचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन मिठाई वाटली.

काँग्रेसने गेले कित्येक वर्षे जातीनिहाय जनगणना करावी हा विषय लावून धरला होता. राहुल गांधींनी वारंवार केंद्र सरकारला याची आठवण करून दिली होती. आम्ही जेव्हा ही मागणी करायचो, तेव्हा भाजपवाले आमची मस्करी करायचे. आता शेवटी केंद्र सरकारने आमच्या मागण्यापुढे गुडघे टेकलेच आहेत. मात्र आम्ही यावर न थांबता याची अमंलबजावणी होईपर्यंत यावर लक्ष ठेवणार आहोत, असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.

या रॅलीमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलनाची गरज का भासली याविषयी स्पष्ट केले. आंदोलनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना खूप दिवसांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची संधी मिळाली. त्यांनी यावेळी घोषणा देत लक्ष वेधून घेतले.

गांधी सर्वसामान्यांचे नेते

संसदेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी हे लहान लोकांचे नेते आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेदरम्यान त्यांनी ४५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. महात्मा गांधीनंतर केवळ राहुल गांधीने असे केले आहे. यातून त्यांना वाटले होते की मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. या अनुषंगाने जनगणनेची मागणी त्यांनी केली होती. यापुढे देखील आम्ही सरकारला योग्य दिशा दाखविण्यास काम करणार आहोत, असे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस