शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय म्हणजे लोकांचा विजय: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 07:56 IST

काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅलीकाढून जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाने देशातील जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी केवळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दडपणाखाली घेतला आहे. हा एका प्रकारे काँग्रेसचा नाही तर जनतेचा विजय आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेताच, काँग्रेसने राजधानीत काँग्रेस हाऊस ते भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढत विजयाचा जल्लोष केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासोबत, आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, व काँग्रेसचे इतर ओबीसी समिती, अनुसूचित जाती-जमाती समितीचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात जाऊन मिठाई वाटली.

काँग्रेसने गेले कित्येक वर्षे जातीनिहाय जनगणना करावी हा विषय लावून धरला होता. राहुल गांधींनी वारंवार केंद्र सरकारला याची आठवण करून दिली होती. आम्ही जेव्हा ही मागणी करायचो, तेव्हा भाजपवाले आमची मस्करी करायचे. आता शेवटी केंद्र सरकारने आमच्या मागण्यापुढे गुडघे टेकलेच आहेत. मात्र आम्ही यावर न थांबता याची अमंलबजावणी होईपर्यंत यावर लक्ष ठेवणार आहोत, असेही पाटकर यांनी यावेळी सांगितले.

या रॅलीमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांना आमदार आणि विरोधी पक्षनेते यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलनाची गरज का भासली याविषयी स्पष्ट केले. आंदोलनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना खूप दिवसांनी अशा प्रकारे आंदोलन करण्याची संधी मिळाली. त्यांनी यावेळी घोषणा देत लक्ष वेधून घेतले.

गांधी सर्वसामान्यांचे नेते

संसदेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी हे लहान लोकांचे नेते आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेदरम्यान त्यांनी ४५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. महात्मा गांधीनंतर केवळ राहुल गांधीने असे केले आहे. यातून त्यांना वाटले होते की मागासवर्गीयांवर अन्याय होत आहे. या अनुषंगाने जनगणनेची मागणी त्यांनी केली होती. यापुढे देखील आम्ही सरकारला योग्य दिशा दाखविण्यास काम करणार आहोत, असे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस