शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

तारापूर देशातील सर्वात प्रदूषित औद्योगिक वसाहत; औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिकलाही पर्यावरणाचे उपाय योजण्यास अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:03 IST

औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिकलाही पर्यावरणाचे उपाय योजण्यास अपयश

राजू नायकपणजी : देशातील निकृष्ट दर्जाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये महाराष्ट्राच्या तारापूर वसाहतीचा क्रमांक खूपच वरच्या क्रमाने लागत असून औरंगाबाद आणि नाशिक औद्योगिक वसाहतींनाही आपले औद्योगिक प्रदूषण थांबवता आलेले नाही. उलट त्यांचा दर्जाही खालावत आहे.केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्या ‘डाऊन टू अर्थ’ या पर्यावरणविषयक संशोधन पत्रिकेने आपला वार्षिक पर्यावरणविषयक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात औद्योगिक विश्वाचा कठोर आढावा घेतला आहे. 

जल प्रदूषणामध्ये देशातील ८८ प्रदूषित औद्योगिक वसाहतींमध्ये ज्यांची कामगिरी आणखी खालावली त्यामध्ये औरंगाबाद, नाशिक आणि तारापूर या औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. तारापूरने तर २००९ च्या तुलनेने खूपच वाईट कामगिरी केली आहे. ही निकृष्ट कामगिरी देशात सर्वाधिक आहे. औरंगाबादने २००९ च्या तुलनेने पाण्याचे प्रदूषण वाईट टप्प्यावर नेले आणि नाशिकची परिस्थिती अनेक दृष्टीने योग्य म्हणता येणार नाही.

सर्वांत प्रदूषित परिसर म्हणून जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर आदींचा समावेश आहे. सेपीने ६० ते ७० या क्रमवारीमध्ये ज्या औद्योगिक वसाहतींना क्रमवारी दिली आहे, त्यामध्ये नाशिकचाही समावेश होतो. या १२ नव्या औद्योगिक वसाहतींमध्ये महाराष्ट्रातील महाड औद्योगिक वसाहतीचाही समावेश होतो.  २००९ ते २०१८ पर्यंत वायू प्रदूषण वाढलेल्या सेपी निर्देशांकामध्ये चंद्रपूर, तारापूर व नाशिकचा समावेश होतो. त्यांच्यामध्ये चंद्रपूर आणि तारापूरने ७० चा निर्देशांक गाठला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी सेपीचा जो निर्देशांक निश्चित केला, त्याला कोणत्याही प्रकारे भीक न घालण्याचेच राज्यांचे धोरण आहे. २००९ पासून ते २०१८ पर्यंत औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषण वाढले आणि अजूनही त्यामध्ये फरक दिसत नाही. ज्या औद्योगिक वसाहती निकृष्ट दर्जाच्या मानल्या गेल्या होत्या, त्या अजूनही भीषण अवस्थेत आहेत आणि त्यावर उपाय योजण्याचे सोडून केंद्र सरकार आणि राज्ये कायदे सौम्य करण्याच्याच हालचाली करू लागले आहेत. ही जर मानसिकता असेल तर कायदे आणि यंत्रणा निर्माण करण्यासाठी खर्च तरी का करावा? - निवित कुमार यादव,  शास्त्रज्ञ, डाऊन टू अर्थ

टॅग्स :environmentपर्यावरणMIDCएमआयडीसी