शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

'इंडिया' अलायन्सचे अस्तित्व बेभरवशाचे: आरजी, काँग्रेसला निवृत्त होण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:26 IST

त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात भाजपकडे टक्कर देण्याची ताकद फक्त आरजीकडेच आहे, दावा असा करत पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनल्याचे ते म्हणाले.

चार राज्यांच्या विधानसभा निकालानंतर तीन राज्यांमध्ये काँग्रेसची जी धूळधाण झाली आहे, ते पाहता काँग्रेसला कोणतेच भवितव्य राहिलेले नाही. राजस्थान व छत्तीसगढमध्ये काँग्रेस सत्ताही राखू शकले नाही, अशी टीका परब यांनी केली. ते म्हणाले की, निकालानंतर विरोधकांच्या 'इंडिया' अलायन्सचे अस्तित्त्वही आता बेभरवशाचे बनले आहे. दि. ६ रोजी 'इंडिया' अलायन्सची बैठक होणार होती. परंतु नीतिशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी पाठ फिरविल्याने ती रद्द झाली आहे. काँग्रेस आता 'इगो' बाजुला ठेवून इतर पक्षांना संधी द्यावी. जुना पक्ष असूनही लोकांनी कौल दिला नाही. काँग्रेसकडे आता केवळ तीन राज्ये राहिली आहेत.

परब म्हणाले की, गोव्यात विरोधकांच्या युतीबाबत इंडिया अलायन्सवर आम्ही अवलंबून न राहता आमचे काम चालूच ठेवले. येथे भाजपला आरजीच टक्कर देऊ शकतो.'

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी