शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिंबल ग्रामसभेत म्हादईला पाठिंबा; जलस्रोत नष्ट होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:05 IST

म्हादईच्या रक्षणार्थ राज्यातील विविध पंचायतींकडून पाठिंबा वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हादईच्या रक्षणार्थ राज्यातील विविध पंचायतींकडून पाठिंबा वाढत आहे. रविवार, दि. १२ रोजी झालेल्या चिंबलच्या ग्रामसभेतही चिंबलवासीयांनी वाचवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. या विषयाची गंभीरता लक्षात घेता रविवार, दि. १९ रोजी सकाळी १०:३० वाजता पुन्हा एकदा ग्रामसभेत चर्चा करून ठराव घेण्याचा निर्णय झाला. 

चिंबलच्या ग्रामसभेत यावेळी एनआयओचे वैज्ञानिक डॉ. अनिल यांनी उपस्थित राहून गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी सरपंच संदेश शिरोडकर यांनीसुद्धा ग्रामस्थांना म्हादईला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. 

..तर पाण्याच्या खारटपणावर प्रभाव

वैज्ञानिक डॉ. अनिल म्हणाले की, म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवले तर मांडवी नदीच्या पाण्याच्या खारटपणावर त्याचा प्रभाव पडेल व त्याचा थेट पश्चिम घाटातील वन्यजीव, वनक्षेत्र, लोकांच्या जीवनमानावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढीमुळे यापूर्वीच नदी, ताले, विहिरी आटत आहेत. जर म्हादईचे पाणी वळवले तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. म्हादईचे महत्त्व जाणा, असे आवाहन त्यांनी केले.

खांडेपार नदीवरही परिणाम : कुंकळ्येकर

ग्रामस्थ तुकाराम कुंकळ्येकर म्हणाले की, चिंबल तसेच संपूर्ण तिसवाडी तालुक्याला ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर प्रकल्प हा खांडेपार नदीतून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. खांडेपार नदी ही म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवले तर खांडेपार नदीही आटण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसवाडी तालुक्यात निर्माण होणाऱ्या स्थितीची कल्पना न केलेली बरीच असे त्यांनी नमूद केले.

विहिरीही आटण्याच्या मार्गावर

चिबल मंचचे गुरुदास शिरोडकर म्हणाले की, चिंबल गावात प्रत्येक प्रभागात विहिरी आहेत. मात्र त्यापैकी अनेक विहिरी आटण्याच्या मार्गावर आहेत. चिंबल येथे वडाचीबाय म्हणून विहीर असून, जेव्हा कधी गावातील नळांना पाणीपुरवठा होत नाही, तेव्हा लोक या विहिरीतील पाण्यावर अवलंबून असतात. सदर विहीर संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करते, असे त्यांनी सांगितले."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा