शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

तिलारीतून डिसेंबरात पुरवठा सुरु - सुशांत नाडकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 19:03 IST

डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. 

म्हापसा - डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. 

तिलारी धरणातून गोव्यात पाणी पुरवठा सुरु करण्यापूर्वी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दर वर्षी पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाते; पण या वर्षी दुरुस्तीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने नाडकर्णी म्हणाले. गरज पडल्यास कालव्याच्या दुरुस्तीचे काम योग्य निरीक्षणानंतर हाती घेतले जाणार आहे. तोपर्यंत काही अंशी पुरवठा सुरु ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने पुरवठा सुरु केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

गोव्यात तिलारीच्या पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी होत असल्याचे त्यांच्या नजरेला आणून दिले असता या पाण्याचा वापर जास्तीत जास्त पिण्यासाठी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तिलारी पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी करण्यावर प्राधान्य दिले जाणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर कृषीसाठी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. ज्या वेळी तिलारीतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला त्यावेळी १६,९७८ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आलेली; पण आता हे प्रमाण कमी होवून १४,५२१ हेक्टर जमीन ओलीताखाली असल्याचे ते म्हणाले. जमीन ओलिताखाली येण्याचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्यासाठी वापर करण्यात येत असला तरी कृषीच्या वापरावर त्याचे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

उत्तर गोव्यातील काही भागात शेतक-यांसाठी बांधण्यात आलेले कालवे वापराविना असल्याने ते नादुरुस्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले असता अशा भागातील कालवे पुन्हा दुरुस्त करुन त्याचा पुर्नवापर केला जाणार असल्याची माहिती दिली. प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लक्ष ठेवले जात असल्याने कुठल्याही परिस्थितीत डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकल्पाशी संबंधीत सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नाडकर्णी यांनी दिली. 

टॅग्स :Tilari damतिलारि धरणgoaगोवा