शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

तिलारीतून डिसेंबरात पुरवठा सुरु - सुशांत नाडकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 19:03 IST

डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. 

म्हापसा - डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. 

तिलारी धरणातून गोव्यात पाणी पुरवठा सुरु करण्यापूर्वी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दर वर्षी पावसाळा संपल्यानंतर या कामाला सुरुवात केली जाते; पण या वर्षी दुरुस्तीवर अद्याप निर्णय झाला नसल्याने नाडकर्णी म्हणाले. गरज पडल्यास कालव्याच्या दुरुस्तीचे काम योग्य निरीक्षणानंतर हाती घेतले जाणार आहे. तोपर्यंत काही अंशी पुरवठा सुरु ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने पुरवठा सुरु केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

गोव्यात तिलारीच्या पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी होत असल्याचे त्यांच्या नजरेला आणून दिले असता या पाण्याचा वापर जास्तीत जास्त पिण्यासाठी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तिलारी पाण्याचा वापर जास्त प्रमाणावर पिण्यासाठी करण्यावर प्राधान्य दिले जाणार असल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर कृषीसाठी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. ज्या वेळी तिलारीतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला त्यावेळी १६,९७८ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आलेली; पण आता हे प्रमाण कमी होवून १४,५२१ हेक्टर जमीन ओलीताखाली असल्याचे ते म्हणाले. जमीन ओलिताखाली येण्याचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्यासाठी वापर करण्यात येत असला तरी कृषीच्या वापरावर त्याचे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

उत्तर गोव्यातील काही भागात शेतक-यांसाठी बांधण्यात आलेले कालवे वापराविना असल्याने ते नादुरुस्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले असता अशा भागातील कालवे पुन्हा दुरुस्त करुन त्याचा पुर्नवापर केला जाणार असल्याची माहिती दिली. प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातून हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लक्ष ठेवले जात असल्याने कुठल्याही परिस्थितीत डिसेंबर २०१९ पर्यंत प्रकल्पाशी संबंधीत सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नाडकर्णी यांनी दिली. 

टॅग्स :Tilari damतिलारि धरणgoaगोवा