शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 28, 2024 14:23 IST

उकाड्यामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत.

पणजी : उन्हाची झळ आता भाज्यांनाही बसू लागली आहे. पणजी बाजारात वालपापडी १८० ते २०० रुपये किलो तर मिरची १२० रुपये किलो इतकी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

उकाडयामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत. लिंबू महागले असतानाच आता भाज्यांवरही वाढत्या तापमानाची झळ बसू लागली आहे. गोव्यात बेळगाव व कोल्हापूर येथून भाजी आयात होते. सध्या तेथील घाऊक बाजारात भाज्या महागल्याने त्याचा थेट फटका येथील किरकोळ बाजारातील भाजी दरांवर होत आहे.

वालपापडीचा दर साधारणता ८० ते १०० रुपये किलो इतका असतो. मात्र अचानक त्याच्या दरात वाढ होऊन तो थेट १८० ते २०० रुपये किलो इतका झाला आहे. तर बारीक हिरवी मिरची सुध्दा ३० रुपये पाव किलो म्हणजेच १२० रुपये किलो या दराने मिळत आहे. उकाडा असाच कायम राहिला तर अन्य भाज्या सुद्धा महागण्याची शक्यता असल्याचे पणजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाvegetableभाज्या