शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो

By पूजा प्रभूगावकर | Updated: April 28, 2024 14:23 IST

उकाड्यामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत.

पणजी : उन्हाची झळ आता भाज्यांनाही बसू लागली आहे. पणजी बाजारात वालपापडी १८० ते २०० रुपये किलो तर मिरची १२० रुपये किलो इतकी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे.

उकाडयामुळे लिंबू महागले असून बाजारात मोठे लिंबू १० रुपये एक तर मध्यम आकाराचे लिंबू ५० रुपयांना ७ ते ८ असे मिळत आहेत. लिंबू महागले असतानाच आता भाज्यांवरही वाढत्या तापमानाची झळ बसू लागली आहे. गोव्यात बेळगाव व कोल्हापूर येथून भाजी आयात होते. सध्या तेथील घाऊक बाजारात भाज्या महागल्याने त्याचा थेट फटका येथील किरकोळ बाजारातील भाजी दरांवर होत आहे.

वालपापडीचा दर साधारणता ८० ते १०० रुपये किलो इतका असतो. मात्र अचानक त्याच्या दरात वाढ होऊन तो थेट १८० ते २०० रुपये किलो इतका झाला आहे. तर बारीक हिरवी मिरची सुध्दा ३० रुपये पाव किलो म्हणजेच १२० रुपये किलो या दराने मिळत आहे. उकाडा असाच कायम राहिला तर अन्य भाज्या सुद्धा महागण्याची शक्यता असल्याचे पणजी बाजारातील भाजी विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाvegetableभाज्या