शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन नगरीत रोज एक आत्महत्या

By admin | Updated: October 4, 2014 01:21 IST

पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते.

पणजी : पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावतात; पण २0११ ते २0१३ पर्यंतच्या अहवालानुसार राज्यात दरदिवशी एक आत्महत्या होते. राज्यात प्रत्येक आठवड्याला साधारण ५.६१ लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या तीन वर्षांत ८७७ लोकांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली आहे. यात सरकारी नोकरी न मिळणे, तणाव, मानसिक अस्वस्थता, प्रेम प्रकरणात अपयश, मानसिक, शारीरिक त्रास इत्यादी कारणांचा समावेश आहे. गोवा राज्य भारतातील सर्वात लहान राज्य असले तरी आत्महत्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या लोकसंख्येप्रमाणे देशात २0१२ सालच्या अहवालाप्रमाणे एका लाखाच्या आकडेवारीनुसार ११.७ टक्के आत्महत्यांचे प्रमाण आहे. मात्र, गोव्यात १८.४ टक्के आढळते. येथील दामोदर महाविद्यालयाचे नामदेव गावस व सतीश सावळ यांनी केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील आर्थिक परिस्थिती, मानसिक ताणतणाव, पर्यावरणीय व एकंदर आरोग्य साधनसुविधा हे आत्महत्या करण्यासाठी मानवी मनाला प्रवृत्त करतात. मानसिक कमकुुवतपणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, असाही निकर्ष आहे. १६ वर्षांवरील वयोगटात ८७७ पैकी ३३८ व्यक्तींनी केवळ मानसिक तणावामुळे आत्महत्या केली असल्याचे आढळते. २0११ ते २0१३ दरम्यान ६३ व्यक्तींनी दारूच्या अतिरिक्त व्यसनापायी आत्महत्या केली असल्याचे आढळते. दारूचे व्यसन हेही आत्महत्येचे कारण म्हणून पुढे येऊ लागले आहे. कामाच्या ठिकाणी सतावणूक होत असल्यानेही काही व्यक्तींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी दशेत परीक्षेत कमी गुण मिळाल्याने किंवा अभ्यासाच्या भीतीने लहान वयात आत्महत्येचे पर्याय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही आहे. अभ्यासाची भीती आणि तणावामुळे मानसिकरीत्या खचत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशकाची आवश्यकता आहे. शिक्षण खात्याने प्रत्येक शाळेत समुपदेशकाची नेमणूक केली आहे. वर्षाला साधारण १५ हजार ४४७ विद्यार्थी या केंद्राकडे येतात. यातील १ हजार ३१७ विद्यार्थी भावनिक समस्यांत अडकलेले असल्याचे आढळते. ९४३ विद्यार्थी नातेसंबंधाच्या समस्यांत, तर २0३ विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे समोर आले आहे. समुपदेशकांच्या सहवासात आलेल्या ५६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तर २0३ विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास गमावल्याचे जाणवते. चांगल्या करिअरसाठी जास्त अभ्यास जास्त गुण मिळविण्याच्या दडपणाखाली, तणावाखाली विद्यार्थी अनेक वाईट मार्ग जवळ करतात. यात दारू, ड्रग्स, तंबाखू, सिगारेट सारखे पर्याय वापरतात. (प्रतिनिधी)